शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २५ लाख लिटरनी दूध संकलनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 04:52 IST

दुधाची टंचाई भासणार : अतिवृष्टी, परतीच्या पावसाचा परिणाम

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात जुलै-आॅगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने शेती उद्ध्वस्त झालीच; मात्र दूध व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. राज्याच्या दूध संकलनात दैनंदिन २५ लाख लिटरची घट झाली असून सहा महिन्यांपूर्वी गायीचे दूध अतिरिक्त म्हणून नाकारणाऱ्या दूध संघांना आता दूध उत्पादकांच्या दारात जावे लागत आहे.

राज्यात रोज सुमारे दोन कोटी १० लाख लिटर दूध संकलन होते. यापैकी एक कोटी २५ लाख लिटर दुधाचे सहकारी व खासगी संघ संकलन करतात. दूध संकलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर हे जिल्हे इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. महाराष्टÑातील ऋतू आणि हवामान पाहिले तर आॅक्टोबरपासून दुधाचा पुष्ठकाळ सुरू होतो. जानेवारीपर्यंत दूध वाढत जाते आणि त्यानंतर उन्हाळा वाढू लागली की दूध कमी होत जाते. यंदा मात्र डिसेंबर निम्मा झाला तरी पुष्ठकाळ सुरू झालेला दिसत नाही. सरासरी रोजच्या संकलनात २५ ते ३० लाख लिटरची घट दिसत आहे. मध्यंतरी गाय व म्हशीचे दूध वाढले होते. म्हशीच्या दुधाला मागणी राहिली. मात्र एका-एका संघाकडे लाखो लिटर गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने त्यांनी दूधच नाकारले. काही दूध संघांनी पाण्यापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्याने दूध उत्पादकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली. त्याचा परिणामही संकलन घटण्यावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गाय दूध खरेदी दर ३१ रुपयांवरगायीच्या दुधापासून पावडर व बटर तयार केले जाते. मात्र सध्या गायीचे दूध संकलन कमालीचे घसरल्याने पुणे, अहमदनगर, आदी जिल्ह्यांत अनेक खासगी संघ ३१ रुपये लिटरने दूध खरेदी करीत आहेत.ही आहेत प्रमुख कारणे :च्अतिवृष्टी, महापुरामुळे पश्चिम महाराष्टÑात चाराटंचाईच्महापुरात हजारो दुभती जनावरे वाहून गेली.च्परतीच्या पावसाने पुन्हा चाºयाचा प्रश्न गंभीर.च्अनेक संघांनी दूध नाकारले.च्पाण्यापेक्षा कमी दराने दूधखरेदी केले.अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे दूध उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संकलनात खूप घट झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर आगामी काळात दुधाची टंचाई भासू शकते.- गोपाळराव मस्के, अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य दूध प्रक्रिया कल्याणकारी संस्था

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठा