शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Published: June 30, 2015 3:42 AM

पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

मुंबई/ कोल्हापूर : पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नसल्याने जूनअखेर पीककर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याजसवलत योजनेपासून मुकावे लागणार होते. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्यांना ० टक्के, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला दोेन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; पण ही रक्कम एक वर्षाच्या आत म्हणजे जूनअखेर परतफेड केली, तरच या योजनेचा लाभ त्यांना मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांची बिले वेळेत मिळत नसल्याने जूनअखेर कर्जाची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा तर उसाचे गाळप होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. राज्यातील ७० टक्के शेतकरी थकीत गेला आहे. परिणामी त्याला व्याजसवलतीला मुकावे लागणार होते. त्यामुळे कर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विकास सेवा संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.-----------------------------जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी व पीककर्ज परतफेडीस मुदत वाढ द्यावी. या मागणीसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर ‘स्वाभीमानी’ने मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन कर्ज परतफेडीस मुदतवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे.- खासदार राजू शेट्टी----------------------------------------२०१३-१४चे राज्याचे पीक कर्जवाटप16,462 Cr.वाणिज्य बँका1,611 Cr.प्र्रादेशिक ग्रामीण बँका 13,354 Cr.राज्य बँक, जिल्हा बँक, भूविकास बँककेंद्राकडून दिले जाणारे पॅकेज येत्या चार-आठ दिवसांत कारखान्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते भागेल.