शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

समुपदेशकांकडून वसुली

By admin | Updated: January 4, 2017 00:57 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा

- मिलिंद कीर्ती, चंद्रपूर

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा आदेश उशिरा प्राप्त झाल्याने ही वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे या समुपदेशकांना आधीच मानधन कमी मिळत असताना आता त्यांच्यावर अत्यल्प मिळकतीचे गंडांतर आले आहे.२०१२ मध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (एनपीसीडीसीएस) सुरू करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. जून-२०१२ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदांवर कर्मचारी-अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी समुपदेशकांना कृती अंमलबजावणी आराखड्यात (पीआयपी) १२ हजार रुपये मासिक मानधन देण्यात आले. तसेच एनआरएचएमच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मानधनात आठ टक्के वाढ देण्यात आली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये मानधनात पाच टक्के वाढ देण्यात आली.या दरवाढीप्रमाणे समुपदेशकांना आॅगस्ट-२०१६ पर्यंत १४ हजार २०८ रुपये मासिक मानधन देण्यात आले. त्यानंतर २०१६-१७ च्या पीआयपीमध्ये अचानक त्यांचे मानधन १० हजार रुपये करण्यात आले. तोपर्यंत एप्रिल ते आॅगस्टपर्यंत १४ हजार २०८ रुपयांप्रमाणे मानधन देण्यात आले होते. आता त्या सहा महिन्यांच्या १० हजार रुपयांपेक्षा अधिक दिलेल्या मानधनाची वसुली सुरू करण्यात येत आहे. मुंबई येथील आरोग्य भवनात सहसंचालक (असंसर्गजन्यरोग) डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर मानधन कमी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केंद्राकडे सुधारित पीआयपी पाठविण्यात आल्याची माहितीही दिली.१४ हजारांऐवजी १० हजार इतके मानधनआधी समुपदेशकांना १४ हजार रुपये मानधन दिले जात होते. आता १० हजार रुपये मानधन मंजूर झाले आहे. केंद्रीय स्तरावरून ही रक्कम मंजूर झाली आहे. जिल्हास्तरावरून मागणी आल्यानंतर ती राज्यस्तरावरून केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. केंद्राकडून सुधारित पीआयपी प्राप्त झालेले नाही, असे नागपूर येथील सर्कल प्रोग्रॅम मॅनेजर नंदनवार यांनी सांगितले.सध्या प्रत्येक महिन्याला जुन्या मानधनाची कपात केली जात आहे. त्यामुळे हातात केवळ अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. एवढ्या कमी वेतनामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीण होत आहे. - राम बारसागडे, समुपदेशक, चंद्रपूर