शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘अपात्र’ उमेदवाराचा पगार गृहसचिवांकडून वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 06:16 IST

‘मॅट’चा आदेश; महिला तुरुंग उपअधीक्षकाच्या नियुक्तीचे प्रकरण

मुंबई : कारागृह प्रशासनात एका कथित ‘अपात्र’ महिलेच्या केल्या गेलेल्या नेमणुकीशी संबंधित प्रकरणात नोटीस काढून्ही राज्य सरकारने गेले दोन महिने काही उत्तर न दिल्याने या महिलेला गेल्या अडीच वर्षांत पगारापोटी दिली गेलेली रक्कम तुमच्या पगारातून का वसूल करू नये, अशी नोटीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणान (मॅट)े राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीकांत सिंग यांना काढली आहे.

उपअधीक्षक (कारागृह) या पदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या निवड प्रक्रियेत सहभागी झालेल्या व गुणवत्ता यादीत अंतिमत: नेमल्या गेलेल्या स्वाती जोगदंड यांच्या खोलोखाल राहिलेल्या नाशिक जिल्ह्यातील श्रीमती एस.एन साळवे (एस. पी. देठे) यांनी केलेल्या याचिकेवर ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. अंबादास जोशी यांनी हा आदेश दिला.

स्वाती जोगदंड यांची नेमणूक मे २००६ मध्ये झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांना पगारापोटी दिली गेलेली रक्कम तुमच्या पगारातून का वसूल करू नये? किंवा यास जबाबदार असलेल्या अन्य कोणा अधिकाऱ्याचे तुम्ही नाव सांगणार असाल तर त्याच्या पगारातून का वसूल करू नये, याचे उत्तर ‘मॅट’ने श्रीकांत सिंग या ज्येष्ठ ‘आयएएस’ अधिकाºयांकडून १८ मार्चपर्यंत मागितले आहे.

या प्रकरणात याचिकाकर्त्यांसाठी अ‍ॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते व अ‍ॅड. एम. बी. कदम यांनी काम पाहिले. ‘मॅट’ने २० डिसेंबर रोजी प्रतिवादींना नोटीस काढली होती. ६ फेब्रुवारी या पुढच्या तारखेला जोगदंड किंवा त्यांचे वकील आले नाहीत. सरकारी वकील क्रांत एस. गायकवाड यांनी राज्य सरकार व लोकसेवा आयोगातर्फे वेळ मागून घेतली होती.काय आहे हे प्रकरण?लोकसेवा आयोगाने दिलेल्या जाहिरातीनुसार उपअधीक्षक (कारागृह) हे पद सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी राखीव होते. परीक्षा व मुलाखतीनंतर जी निवड यादी तयार केली त्यात स्वाती जोगदंड यांच्या खालोखालच्या क्रमांकावर साळवे होत्या.नियुक्ती देताना स्वाती जोगदंड यांच्याकडून जी माहिती शपथपूर्वक भरून दिली त्यात त्यांनी आपल्याला दोन अपत्ये असल्याचे सांगितले. जोगदंड यांना प्रत्यक्षात दोन नव्हे तर तीन अपत्ये आहेत व त्यांनी असत्य माहिती देऊन अपात्र असूनही नोकरी मिळविली, अशी तक्रार साळवे यांनी केली.