शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नेत्यांच्या सुरक्षेचे शुल्क वसूल करा

By admin | Updated: March 18, 2017 02:52 IST

बडे व्यावसायिक, आजी-माजी नेते आणि सेलीब्रिटींनी थकवलेले संरक्षण शुल्क वसूल करण्याबाबत सरकार विलंब करत असल्याने उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला

मुंबई : बडे व्यावसायिक, आजी-माजी नेते आणि सेलीब्रिटींनी थकवलेले संरक्षण शुल्क वसूल करण्याबाबत सरकार विलंब करत असल्याने उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला चांगलचे खडसावले. पैसे भरू शकणाऱ्यांकडून राज्य सरकार अद्याप थकीत रक्कम का वसूल करत नाही? राज्य सरकारला दान करायचे आहे का? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.संरक्षण देऊनही त्याचे शुल्क न भरणाऱ्या राजकीय नेत्यांकडून व अन्य व्हीआयपींकडून ते वसूल करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.शुक्रवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी संरक्षण देण्यात आलेल्या सर्व व्हीआयपींची यादी खंडपीठापुढे सादर केली. तसेच आतापर्यंत मुंबईतील व्हीआयपींकडून २१ कोटी रुपये थकीत होते, मात्र १६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. पाच कोटी रुपये लवकरच संबंधित व्हीआयपींकडून वसूल करू, अशी माहिती वग्यानी यांनी खंडपीठाला दिली.या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवत उच्च न्यायालयाने सरकारला थकीत रक्कम वसूल करण्यासाठी काय पावले उचलण्यात आली, याची माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) लोकांचे पैसे वाया घालवता येणार नाहीत‘एखाद्या गरिबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि तो संरक्षण शुल्क भरू शकला नाही, तर आम्ही समजू शकतो. पण तुमच्या यादीत तर राजकीय नेते, त्यांच्या शेजारचे, उद्योगपती, सेलीब्रिटींचा समावेश आहे. हे लोक पैसे भरू शकतात. मग सरकार त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी पावले का उचलत नाही? हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. राजकीय नेत्यांच्या शेजारच्यांना संरक्षण देण्याची गरज काय? पंधरवड्याला तपासणी करून काम होऊ शकते. लोकांचे पैसे अशा तऱ्हेने वाया घालवता येणार नाहीत,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.