शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
4
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
5
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
6
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
7
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
8
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
9
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
10
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
11
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
12
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
13
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
14
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
15
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
16
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
17
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
18
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
19
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
20
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

‘एफआरपी’ कर्जाची पुनर्रचना करा

By admin | Updated: September 10, 2016 05:05 IST

केंद्र शासनाने मागील दोन हंगामांत कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी

मुंबई/कोल्हापूर : केंद्र शासनाने मागील दोन हंगामांत कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी, अशी महत्त्वाची मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर उद्योगाशी संबंधित नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर साखर उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.साखर कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना व इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे संचालक शिवाजीराव पाटील, श्रीराम शेटे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा आदी उपस्थित होते.शरद पवार व वळसे-पाटील यांनी साखर उद्योगापुढील प्रश्न मांडले. मागील दोन हंगामांत (२०१३-१४ व २०१४-१५) कारखानदारी अडचणीत असताना केंद्र शासनाने एफआरपी देण्यासाठी कर्ज दिले आहे. परंतु सलग दोन वर्षे साखरेचा बाजारातील दर कमी राहिल्याने त्याची परतफेड करण्यात अडचणी आहेत. येत्या हंगामात तर अडचणी जास्त आहेत. अनेक कारखाने हंगामच घेणार नाहीत; तर जे घेतील त्यांचा हंगाम उसाअभावी अर्ध्यातच बंद करावा लागणार आहे. दोन वर्षांचे कर्ज मिळून सरासरी टनास ७०० रुपये एवढे हे कर्ज आहे. त्याची परतफेड चार वर्षांत करावयाची असल्याने हप्ते सुरू होत आहेत. हप्ता थकला तर केंद्र व राज्य शासनाचे व्याज सवलत रद्द होते; त्यामुळे कारखानदारीची कोंडी झाली आहे. त्यासाठी या कर्जाची पुनर्रचना करून कर्ज परतफेडीची मुदत वाढवली तर कारखानदारीस दिलासा मिळू शकेल, असे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.राज्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उसाच्या पिकासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करता येईल किंवा कसे यासाठी साखर कारखाने व शेतकरी यांच्या समन्वयाने स्वतंत्र मॉडेल तयार करण्यात येईल.त्याचबरोबर दुष्काळी जिल्ह्यांसाठी वेगळा आराखडा तयार करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)>साखर कारखाने अडचणीतनऊ कारखान्यांचे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प तयार आहेत. राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने त्यासाठीचे वीज खरेदी करार (पॉवर पर्चेस अ‍ॅग्रीमेंट) करणे आवश्यक आहे. परंतु आता राज्याची विजेची गरज भागत असल्याने हे करारच रखडले आहेत. ज्या कारखान्यांचे हे प्रकल्प आहेत ते दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यानेही शासन हे करार करण्यास तयार नसल्याच्या तक्रारी आहेत. हा करार झाल्याशिवाय प्रकल्पासाठी केंद्राच्या साखर विकास निधीतील अनुदान मिळत नाही. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. >साखर उद्योगाच्या मागण्याहंगाम २०१५-१६ व २०१६-१७ साठी ऊस खरेदीकर माफ करा, शासकीय देणी प्रलंबित ठेवा शासकीय थक हमी विनाअट द्या, सॉफ्ट लोन द्या इथेनॉलवरील वाशी, नवी मुंबई व मिरज डेपोवरील स्थानिक संस्था कर माफ करा