शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नवीन महाविद्यालये, तुकड्यांची मान्यता रोखली

By admin | Updated: May 3, 2015 04:53 IST

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यानंतर गतवर्षी महाविद्यालयात सुमारे २५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या

मुंबई : राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यानंतर गतवर्षी महाविद्यालयात सुमारे २५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षातही नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात असल्याने महाविद्यालयात वाढीव प्रवेश क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्यात पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, नक्षलग्रस्त, शहरी इत्यादी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यामध्ये नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात येते. २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात राज्यात नवीन महाविद्यालये आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्यात आली होती. परंतु मागील वर्षी महाविद्यालयांमध्ये २५ टक्के जारा रिक्त राहिल्या होत्या. तसेच २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये, तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील जागांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २0१५-१६ मध्ये राज्यात अकृषी विद्यापीठाच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात राज्यात एकही नवीन महाविद्यालय सुरू होणार नाही. यामुळे नवीन महाविद्यालये सुरू करणाऱ्या संस्थांना आता त्या पुढील शैक्षणिक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)