शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वात घातक का बनली?, तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 14:19 IST

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर स्वरुपात पाहायला मिळाली.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर स्वरुपात पाहायला मिळाली. यात देशातील दोन राज्यांची संपूर्ण देशाची चिंता वाढवली होती. यात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांचा समावेश होता. कारण या दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळाला. केरळमध्ये कोरोनाची पहिली लाट त्यामानानं चांगल्या पद्धतीनं हाताळली गेली. पण दुसऱ्या लाटेत केरळमध्ये कोरोनाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात वाढला. 

महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ होण्यामागे काही महत्वाची कारणं होती. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्यातील लोकसंख्येची घनता, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणं इत्यादी कारणं प्रसार वाढण्यासाठी जबाबदार आहेत. याशिवाय ऋतूनुसार उद्भवणाऱ्या आजारांचंही यात योगदान आहे. मे महिन्यात महाराष्ट्रात अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण देशभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण मृत्यूपैकी एच चतुर्थ्यांश मृत्यू एकट्या महाराष्ट्रात होत होते. 

राज्यात सर्वाधित कोरोनाच चाचण्या देखील घेतल्या जात होत्या. एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात जवळपास ७० -७० लाख चाचण्या होत होत्या. नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात जेव्हा कोरोनाचं संकट कमी झालं होतं तेव्हा राज्यात दरमहा १८ लाख चाचण्या होत होत्या. 

महाराष्ट्रात दुसरी लाट गावागावात पोहोचलीकोरोनाची दुसरी लाट राज्यातील अगदी ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली. त्यामुळे चिंतेत वाढ झाली. पहिल्या लाटेत मुंबईची वाईट परिस्थिती होती. कारण मुंबई सर्वाधिक वर्दळीचं, परदेशी पर्यटकांचं आण लोकसंख्येच्या घनतेचं ठिकाण आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्येचा विचार करता कोरोनाचा प्रसार होणं सहाजिक आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. पहिल्या लाटेत अमरावतीसारख्या इतर काही ठिकाणी दैनंदिन पातळीवर १०० कोरोना रुग्ण आढळत होते. तर मुंबईसारख्या ठिकाणी दिवसाला ३५ हजार रुग्णांची भर पडत होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती दिवसाला १ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत होती. अमरावतीत कोणतंही आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही किंवा मुंबईसारखी लोकसंख्येची घनता देखील नाही. असं असतानाही अशा ठिकाणी रुग्णसंख्या वाढल्यानं राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार केला. 

केरळमध्ये निवडणुकीचा बसला मोठा फटका?कोरोनाच्या पहिल्या लाटेवर केरळ राज्यानं चांगलं नियंत्रण मिळवलं होतं. पण दुसऱ्या लाटेत केरळमध्ये परिस्थिती बिघडलेली पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मतानुसार, केरळमध्ये झालेली निवडणूक कोरोना प्रसाराला कारणीभूत ठरली आहे. एप्रिल महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. पण यासाठीची तयारी मार्च महिन्यापासूनच सुरू झाली होती. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं गेलं. 

१५ मार्च रोजी केरळमध्ये १,०५४ नवे रुग्ण आढळले होते. ३ ऑगस् २०२० नंतर ही सर्वात कमी आकडेवारी होती. पण मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात दैनंदिनरित्या १८०० हून अधिक रुग्ण वाढू लागले होते. महाराष्ट्राप्रमाणेच केरळनंही कोरोना चाचण्यांच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली नाही. केरळमध्ये मे महिन्यात जवळपास ४० लाख कोरोना चाचण्या झाल्या होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस