शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

रिकामावेळ व्यसनांची खरी जननी - मकरंद अनासपुरे

By admin | Updated: January 18, 2017 21:54 IST

सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते, मुख्यत्वे रिकामा वेळ व आळस हीच व्यसनांची जननी आहे.

ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि.18 - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते. तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते, मुख्यत्वे रिकामा वेळ व आळस हीच व्यसनांची जननी आहे. सतत क्रियाशील असलेल्या व्यक्तीला व्यसने करण्यास फारसा वेळ मिळत नाही. तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट, दारू यारख्या नकारात्मक व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वाचन, संगीत, स्वत:च्या कामाविषयीची निष्ठा यासारखी सकारात्मक व्यसने लावून घ्यावी, असा सल्ला प्रसिद्ध मराठी चित्रपट कलावंत तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी दिला.
 
सर्च सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, मुक्तिपथ अभियान व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दारू, तंबाखूमुक्तीचा संदेश व संकल्प, खर्रा, गुटखा, तंबाखूची सार्वजनिक होळी करून मुक्तिदिन पाळण्यात आला. सदर कार्यक्रम धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मकरंद अनासपुरे बोलत होते. 
 
कार्यक्रमाला समाजसेवक तथा सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग, अमृत बंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.