शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

सरकारच्या कारवायांचा मुकाबला करण्यास तयार; विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 07:54 IST

राज्य पोलिसांचा दुरुपयोग करून भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया; फडणवीसांचा आरोप

मुंबई : राज्य पोलिसांचा दुरुपयोग करून भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात असून सरकारच्या या अहंकारी वृत्तीचा मुकाबला करण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अधिवेशनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या अधिवेशनात सरकार पुरते उघडे पडले असे ते म्हणाले.प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सहकार खात्याची कोणतीही तक्रार नव्हती. पण पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुमोटो कारवाई केली. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बँका, साखर कारखान्यामध्ये मजूर, माथाडी, पगारदार संस्थांमधून संचालक झालेले कितीजण आहेत याची यादी तयार केली आहे. ती जाहीर करू. मग पोलिसांनी त्यांच्यावरही सुमोटो गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.  ‘त्या’ कंपनीचा मिर्चीशी संबंध नाहीभाजपला इक्बाल मिर्चीकडून १० कोटी रुपये मिळाल्याच्या नाना पटोले यांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले की, त्यांनी पुरावे द्यावेत. ज्या कंपनीकडून पैसे मिळाल्याचे सांगितले जात आहे, तिचा इक्बाल मिर्चीशी काहीएक संबंध नाही.पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईतविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत होईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत केली.सत्तेसाठी लाचारमुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या माणसांशी आर्थिक व्यवहार, मनीलाँड्रिगचे व्यवहार करणारे नवाब मलिक यांचा बचाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला. सत्तेसाठी ते किती लाचार आहेत, याची प्रचिती आल्याची टीका फडणवीस यांनी केली.‘ते सोबत असते तरी कारवाई झालीच असती’पहाटेच्यावेळी झालेला शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले असते, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. त्यावर विचारले असता फडणवीस म्हणाले की, आमच्या बाजूला बसणाऱ्यांवर आमचे नियंत्रण असते. आणि समजा आमच्या शेजारी बसणारे दोषी आढळले असते तर कडक कारवाई केली असती. आज तेच त्यांच्याबरोबर आहेत म्हणून कारवाई सौम्य झाली आहे. त्यांच्याबरोबर न राहिल्याने आम्ही संकटातून वाचलो असे नाही. उलट ते जास्त संकटात आले असते. आम्ही खूप संकटे झेलले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस