शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

औषध निरीक्षक पदांसाठी फेरमुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:54 IST

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे, असा निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने अशी पात्रता असलेल्या ज्या अर्जदारांना याआधी अपात्र ठरविले गेले होते त्यांनाही मुलाखतींसाठी बोलवावे, असा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिला आहे.पात्रता निकषांविषयीचा हा निकाल विचारात घेऊन आयोगाने दोन महिन्यांत नव्याने निर्णय घेऊन पुढील निवड प्रक्रिया करावी, असा आदेश न्या. विजया कापसे तहिलरामानी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने दिला.आयोगाने औषध निरीक्षकांच्या एकूण ३५ पदांसाठी मार्च २०१५मध्ये जाहिरात दिली. पात्र ७७ अर्जदारांच्या गेल्या वर्षी १८ मे रोजी मुलाखती घेण्यात आल्या. ज्या अर्जदारांना ‘संशोधन व विकास’ या क्षेत्रातील कामाचा पदव्युत्तर अनुभव होता त्यांना छाननीत अपात्र ठरवून मुलाखतीसाठी बोलावले गेले नाही. त्यांच्यापैकी नवीन पनवेल येथील संदीप वराडे यांच्यासह ११ जणांनी रिट याचिका केली. आयोगाने अशी भूमिका घेतली की, या पदासाठी ‘औषधीद्रव्य उत्पादन व चाचणी’ या कामाचा अनुभव हा पात्रता निकष आहे. याचिकाकर्त्यांकडे त्याऐवजी ‘संशोधन व विकास’ या कामाचा अनुभव असल्याने ते पात्रता निकषात बसत नाहीत. याआधी दोन क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष मानायचा की नाही हाच मुद्दा सहायक आयुक्त (औषधीद्रव्ये) या पदांच्या निवडीच्या वेळी उपस्थित झाला होता. तेव्हा अनुभव ग्राह्य नाही, असे मानून उमेदवारांना अपात्र ठरविले़ होते़एफडीएचा अप्रामाणिकपणाया प्रकरणात लोकसेवा आयोगाने सुरुवातीस डिसेंबर २०१६मध्ये प्रतिज्ञापत्र करून आपल्या भूमिकेचे समर्थन केले त्यात काही वावगे नव्हते. कारण ती भूमिका चुकीची ठरविणारा उच्च न्यायालयाचा निकाल तोपर्यंत आला नव्हता. अंतिम सुनावणीच्या दीड महिना आधी तसा निकाल आल्यावर आयोगाने माघार घेतली व त्यांचा कोणीही वकील त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उभा राहिला नाही. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने अप्रामाणिकपणा केल्याचे दिसते. कारण ४ मेचा निकाल आल्यानंतरही एफडीए आयुक्तांच्या वतीने सरकारी वकील उभे राहिले व ते जणूकाही हा ताजा निकाल झालेलाच नाही, अशा प्रकारे चुकीच्या भूमिकेचे समर्थन करत राहिले.प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) गेल्यावर ‘मॅट’ने आयोगाच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र बाधित उमेदवारांनी त्याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाने यंदाच्या ४ मे रोजी ‘मॅट’चा निकाल रद्द केला होता. म्हणजेच ‘उत्पादन व चाचणी’ आणि ‘संशोधन व विकास’ या दोन्ही क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष ठरविला गेला होता.हे लक्षात घेऊन आता न्यायालयाने म्हटले की, आयोगाने ज्याकारणाने अर्जदारांना अपात्र ठरविले होते ते कारण ४ मेचा निकालपाहता आता गैरलागू ठरते. त्यामुळे अपात्र ठरविलेल्यांनाही मुलाखतीची संधी द्यावी लागेल.