शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

औषध निरीक्षक पदांसाठी फेरमुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:54 IST

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे, असा निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने अशी पात्रता असलेल्या ज्या अर्जदारांना याआधी अपात्र ठरविले गेले होते त्यांनाही मुलाखतींसाठी बोलवावे, असा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिला आहे.पात्रता निकषांविषयीचा हा निकाल विचारात घेऊन आयोगाने दोन महिन्यांत नव्याने निर्णय घेऊन पुढील निवड प्रक्रिया करावी, असा आदेश न्या. विजया कापसे तहिलरामानी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने दिला.आयोगाने औषध निरीक्षकांच्या एकूण ३५ पदांसाठी मार्च २०१५मध्ये जाहिरात दिली. पात्र ७७ अर्जदारांच्या गेल्या वर्षी १८ मे रोजी मुलाखती घेण्यात आल्या. ज्या अर्जदारांना ‘संशोधन व विकास’ या क्षेत्रातील कामाचा पदव्युत्तर अनुभव होता त्यांना छाननीत अपात्र ठरवून मुलाखतीसाठी बोलावले गेले नाही. त्यांच्यापैकी नवीन पनवेल येथील संदीप वराडे यांच्यासह ११ जणांनी रिट याचिका केली. आयोगाने अशी भूमिका घेतली की, या पदासाठी ‘औषधीद्रव्य उत्पादन व चाचणी’ या कामाचा अनुभव हा पात्रता निकष आहे. याचिकाकर्त्यांकडे त्याऐवजी ‘संशोधन व विकास’ या कामाचा अनुभव असल्याने ते पात्रता निकषात बसत नाहीत. याआधी दोन क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष मानायचा की नाही हाच मुद्दा सहायक आयुक्त (औषधीद्रव्ये) या पदांच्या निवडीच्या वेळी उपस्थित झाला होता. तेव्हा अनुभव ग्राह्य नाही, असे मानून उमेदवारांना अपात्र ठरविले़ होते़एफडीएचा अप्रामाणिकपणाया प्रकरणात लोकसेवा आयोगाने सुरुवातीस डिसेंबर २०१६मध्ये प्रतिज्ञापत्र करून आपल्या भूमिकेचे समर्थन केले त्यात काही वावगे नव्हते. कारण ती भूमिका चुकीची ठरविणारा उच्च न्यायालयाचा निकाल तोपर्यंत आला नव्हता. अंतिम सुनावणीच्या दीड महिना आधी तसा निकाल आल्यावर आयोगाने माघार घेतली व त्यांचा कोणीही वकील त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उभा राहिला नाही. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने अप्रामाणिकपणा केल्याचे दिसते. कारण ४ मेचा निकाल आल्यानंतरही एफडीए आयुक्तांच्या वतीने सरकारी वकील उभे राहिले व ते जणूकाही हा ताजा निकाल झालेलाच नाही, अशा प्रकारे चुकीच्या भूमिकेचे समर्थन करत राहिले.प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) गेल्यावर ‘मॅट’ने आयोगाच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र बाधित उमेदवारांनी त्याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाने यंदाच्या ४ मे रोजी ‘मॅट’चा निकाल रद्द केला होता. म्हणजेच ‘उत्पादन व चाचणी’ आणि ‘संशोधन व विकास’ या दोन्ही क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष ठरविला गेला होता.हे लक्षात घेऊन आता न्यायालयाने म्हटले की, आयोगाने ज्याकारणाने अर्जदारांना अपात्र ठरविले होते ते कारण ४ मेचा निकालपाहता आता गैरलागू ठरते. त्यामुळे अपात्र ठरविलेल्यांनाही मुलाखतीची संधी द्यावी लागेल.