शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

औषध निरीक्षक पदांसाठी फेरमुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:54 IST

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी औषध उद्योगातील ‘संशोधन व विकास’ कामाचा अनुभव हीदेखील नियमानुसार ग्राह्य पात्रता आहे, असा निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने अशी पात्रता असलेल्या ज्या अर्जदारांना याआधी अपात्र ठरविले गेले होते त्यांनाही मुलाखतींसाठी बोलवावे, असा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिला आहे.पात्रता निकषांविषयीचा हा निकाल विचारात घेऊन आयोगाने दोन महिन्यांत नव्याने निर्णय घेऊन पुढील निवड प्रक्रिया करावी, असा आदेश न्या. विजया कापसे तहिलरामानी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने दिला.आयोगाने औषध निरीक्षकांच्या एकूण ३५ पदांसाठी मार्च २०१५मध्ये जाहिरात दिली. पात्र ७७ अर्जदारांच्या गेल्या वर्षी १८ मे रोजी मुलाखती घेण्यात आल्या. ज्या अर्जदारांना ‘संशोधन व विकास’ या क्षेत्रातील कामाचा पदव्युत्तर अनुभव होता त्यांना छाननीत अपात्र ठरवून मुलाखतीसाठी बोलावले गेले नाही. त्यांच्यापैकी नवीन पनवेल येथील संदीप वराडे यांच्यासह ११ जणांनी रिट याचिका केली. आयोगाने अशी भूमिका घेतली की, या पदासाठी ‘औषधीद्रव्य उत्पादन व चाचणी’ या कामाचा अनुभव हा पात्रता निकष आहे. याचिकाकर्त्यांकडे त्याऐवजी ‘संशोधन व विकास’ या कामाचा अनुभव असल्याने ते पात्रता निकषात बसत नाहीत. याआधी दोन क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष मानायचा की नाही हाच मुद्दा सहायक आयुक्त (औषधीद्रव्ये) या पदांच्या निवडीच्या वेळी उपस्थित झाला होता. तेव्हा अनुभव ग्राह्य नाही, असे मानून उमेदवारांना अपात्र ठरविले़ होते़एफडीएचा अप्रामाणिकपणाया प्रकरणात लोकसेवा आयोगाने सुरुवातीस डिसेंबर २०१६मध्ये प्रतिज्ञापत्र करून आपल्या भूमिकेचे समर्थन केले त्यात काही वावगे नव्हते. कारण ती भूमिका चुकीची ठरविणारा उच्च न्यायालयाचा निकाल तोपर्यंत आला नव्हता. अंतिम सुनावणीच्या दीड महिना आधी तसा निकाल आल्यावर आयोगाने माघार घेतली व त्यांचा कोणीही वकील त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उभा राहिला नाही. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने अप्रामाणिकपणा केल्याचे दिसते. कारण ४ मेचा निकाल आल्यानंतरही एफडीए आयुक्तांच्या वतीने सरकारी वकील उभे राहिले व ते जणूकाही हा ताजा निकाल झालेलाच नाही, अशा प्रकारे चुकीच्या भूमिकेचे समर्थन करत राहिले.प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) गेल्यावर ‘मॅट’ने आयोगाच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र बाधित उमेदवारांनी त्याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाने यंदाच्या ४ मे रोजी ‘मॅट’चा निकाल रद्द केला होता. म्हणजेच ‘उत्पादन व चाचणी’ आणि ‘संशोधन व विकास’ या दोन्ही क्षेत्रांतील कामाचा अनुभव समकक्ष ठरविला गेला होता.हे लक्षात घेऊन आता न्यायालयाने म्हटले की, आयोगाने ज्याकारणाने अर्जदारांना अपात्र ठरविले होते ते कारण ४ मेचा निकालपाहता आता गैरलागू ठरते. त्यामुळे अपात्र ठरविलेल्यांनाही मुलाखतीची संधी द्यावी लागेल.