शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

तिढा सुटला, मार्ग सापडला ‘रत्नागिरी गॅस’ची टर्बाईन्स पुन्हा धडधडणार

By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST

अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-विदेशी इंजिनिअर्स येणार

श्रीकर भोसले - गुहागर रत्नागिरी गॅस आणि भारतीय रेल्वेमधील वीज खरेदी वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, लिलाव प्रक्रियेतून कमी दरातील गॅस पुरवठादेखील उपलब्ध होणार आहे. कंपनीची अन्य राज्यांच्या वीज मंडळांशीदेखील वीज खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी गॅसची टर्बाईन्स आता पुन्हा धडधडणार आहेत.सुमारे २५ हजार कोटींच्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. गेली जवळपास दोन वर्षे प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद आहे. प्रकल्पातील यांत्रिक सामुग्री सुस्थितीत ठेवण्यासाठी ठराविक काळाने काही वेळासाठी टर्बाइन्स सुरु केली जात होती. मागील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने येथील कर्मचारीवर्ग कमी करण्यात येत होता. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्णपणे बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच राज्य सरकारने वीज खरेदी करारही रद्द केल्याने उरलीसुरली आशादेखील संपली होती. एनटीपीसी या कर्मचाऱ्यांनाही कमी करुन कंपनीच्या अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये सामावून घेण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लिलावामधून कंपनीला कमी दरात गॅस उपलब्ध होईल. तसेच रेल्वेकडून विजेची मागणी असून, साधारणपणे दर तीन ते चार महिन्यांनी कराराचे नूतनीकरण होईल. ही मागणी ३०० मेगावॅट इतकी असू शकते. कंपनीला उपलब्ध होणाऱ्या गॅसपासून एका टप्प्यातील वीजनिर्मिती होऊ शकते. साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होईल. कंपनीतील विविध विभागातील कमी करण्यात आलेल्या कंत्राटी स्थानिक कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दाभोळ प्रकल्पाच्या अस्तानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी आहे. राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील भांडवली गुंतवणूकदार बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी आहे. विविध कारणांमुळे भवितव्य अस्थिर असलेल्या या प्रकल्पाच्या पुन्हा सुरु होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रकल्प बंद अवस्थेत असतानाही खर्चाचा गाडा हाकणे ही कंपनी प्रशासनाला तारेवरची कसरत बनली आहे.विदेशी इंजिनिअर्स येणारदरम्यान, अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० अभियंत्यांना एनटीपीसीने परत रत्नागिरी गॅसमध्ये पाचारण केले आहे. मूळच्या दाभोळ प्रकल्पाची यांत्रिक बांधणी करणाऱ्या जनरल इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या विदेशी इंजिनिअर्सची टीमही दाखल होत आहे. ५ जूनपासून कंपनीतील टर्बाईन्स पुन्हा धडधडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होण्याचा अंदाज.रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी.राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी.