शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
6
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
7
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
8
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
9
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
10
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
11
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
12
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
13
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
14
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
15
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
17
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
18
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
19
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
20
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”

रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘वाटाण्याच्या अक्षताच’?

By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST

नेतृत्त्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : मंत्रिमंडळ विस्तार, विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये संधी मिळण्याची शक्यता बनली धुसर

रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, आणखी १२ मंत्र्यांचा समावेश होणार आहे. मात्र, यातील केवळ दोन मंत्रीपदे ही शिवसेनेला मिळणार असून, त्यासाठी सेनेचे राज्यातील अन्य रथी-महारथी रांगेत आहेत. परिणामी, मंत्रीपदाची आस लागलेले जिल्ह्यातील सेनेचे आमदार सदानंद चव्हाण व राजन साळवी, भाजपाचे विनय नातू व बाळ माने यांना संधी मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. तसेच विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांमध्येही जिल्ह्यातील सेना वा भाजपाच्या कोणत्याही नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार व विधानपरिषदेच्या रिक्त जागांबाबत जिल्ह्याच्या वाट्यास ‘वाटाण्याच्या अक्षता’च येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य विधान परिषदेचे सदस्य आशिष शेलार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून आल्याने, तसेच विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने, चार जागा रिक्त झाल्या आहेत. बहुमताच्या जोरावर या चारपैकी शिवसेनेला एक रिक्त जागा मिळणार असून, त्याजागी सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची वर्णी लागणार आहे. उर्वरित रिक्त जागांवर मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर यांच्या गटाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून भाजपाबरोबर आलेल्या या पक्षांच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करून, त्यांचा राग शमविण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून सेना-भाजपाच्या कोणत्याही नेत्याला या जागांवर संधी मिळेल, याची सूतराम शक्यता दिसत नाही.रिक्त झालेल्या चार जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळात १२ नवीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याने, त्यात रत्नागिरीला स्थान असेल काय, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या १२पैकी सेनेच्या कोट्यातील २ मंत्रीपदे शिल्लक असून, त्यासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यास त्यात काही मिळेल, याची शक्यताच सध्या फेटाळली जात आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार व विधान परिषदेच्या रिक्त जागा यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली जाण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)मंत्रीपदाची ‘तमन्ना’?मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आहेत. यातील एकतरी मंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला येईल, अशी तमन्ना जिल्ह्यातील सेनेच्या आमदारांमध्ये आहे. आमदार सदानंद चव्हाण व आमदार राजन साळवी यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी दबाव वाढविला आहे. भाजपाची सत्ता राज्यात असल्याने, जिल्ह्यातील भाजपा सक्षम करण्यासाठी बाळ माने किंवा विनय नातू या माजी आमदारांना मंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपानेही त्यांच्या नेतृत्त्वावर दबाव वाढविला आहे. परंतु मंत्रीपदाची ही ‘तमन्ना’ वरिष्ठ नेतेही पूर्ण करू शकणार नाहीत, असेच चित्र आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार विधानसभेवर निवडून आल्याने, तर विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने चार जागा रिक्त.रिक्त जागा मित्रपक्षांना देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार.