शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘वाटाण्याच्या अक्षताच’?

By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST

नेतृत्त्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : मंत्रिमंडळ विस्तार, विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये संधी मिळण्याची शक्यता बनली धुसर

रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, आणखी १२ मंत्र्यांचा समावेश होणार आहे. मात्र, यातील केवळ दोन मंत्रीपदे ही शिवसेनेला मिळणार असून, त्यासाठी सेनेचे राज्यातील अन्य रथी-महारथी रांगेत आहेत. परिणामी, मंत्रीपदाची आस लागलेले जिल्ह्यातील सेनेचे आमदार सदानंद चव्हाण व राजन साळवी, भाजपाचे विनय नातू व बाळ माने यांना संधी मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. तसेच विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांमध्येही जिल्ह्यातील सेना वा भाजपाच्या कोणत्याही नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार व विधानपरिषदेच्या रिक्त जागांबाबत जिल्ह्याच्या वाट्यास ‘वाटाण्याच्या अक्षता’च येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य विधान परिषदेचे सदस्य आशिष शेलार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून आल्याने, तसेच विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने, चार जागा रिक्त झाल्या आहेत. बहुमताच्या जोरावर या चारपैकी शिवसेनेला एक रिक्त जागा मिळणार असून, त्याजागी सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची वर्णी लागणार आहे. उर्वरित रिक्त जागांवर मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर यांच्या गटाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून भाजपाबरोबर आलेल्या या पक्षांच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करून, त्यांचा राग शमविण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून सेना-भाजपाच्या कोणत्याही नेत्याला या जागांवर संधी मिळेल, याची सूतराम शक्यता दिसत नाही.रिक्त झालेल्या चार जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळात १२ नवीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याने, त्यात रत्नागिरीला स्थान असेल काय, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या १२पैकी सेनेच्या कोट्यातील २ मंत्रीपदे शिल्लक असून, त्यासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यास त्यात काही मिळेल, याची शक्यताच सध्या फेटाळली जात आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार व विधान परिषदेच्या रिक्त जागा यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली जाण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)मंत्रीपदाची ‘तमन्ना’?मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आहेत. यातील एकतरी मंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला येईल, अशी तमन्ना जिल्ह्यातील सेनेच्या आमदारांमध्ये आहे. आमदार सदानंद चव्हाण व आमदार राजन साळवी यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी दबाव वाढविला आहे. भाजपाची सत्ता राज्यात असल्याने, जिल्ह्यातील भाजपा सक्षम करण्यासाठी बाळ माने किंवा विनय नातू या माजी आमदारांना मंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपानेही त्यांच्या नेतृत्त्वावर दबाव वाढविला आहे. परंतु मंत्रीपदाची ही ‘तमन्ना’ वरिष्ठ नेतेही पूर्ण करू शकणार नाहीत, असेच चित्र आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार विधानसभेवर निवडून आल्याने, तर विनायक मेटे यांनी राजीनामा दिल्याने चार जागा रिक्त.रिक्त जागा मित्रपक्षांना देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार.