शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

सैन्य भरतीस रत्नागिरी, सिंधुदुर्गचा प्रतिसाद कमी

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

ही भरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होणार आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात खेड, चिपळूण येथे माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्या तुलनेत सध्या रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील युवक सैन्यात भरती होण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे, अशी खंत कोेल्हापूर येथील सैनिक मुख्यालयाचे कर्नल राहुल वर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.रत्नागिरीतील युवकांना सैनिकांना सैन्य भरतीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते, ही बाब लक्षात घेऊन रत्नागिरीत ११ दिवसांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यातील दोन जिल्ह्यांतील युवकांसाठी रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडिअमवर दि. ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत महासैन्यभरती मेळावा होणार आहे, याची माहिती देण्यासाठी आज कर्नल राहुल वर्मा यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत सुभेदार मेजर जे. एस. नागरा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर जगन्नाथ आंब्रे तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अनिल सरदेसाई, अजित करंदीकर, एकनाथ पवार, भास्कर नाठाळकर, माजी सैनिक सुभाष सावंत, शंकर मिलके, मनोज पाटील, महेश पलसपगार आदी उपस्थित होते. ही भरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होणार आहे. रत्नागिरीत २००६ साली सैन्य भरती झाली होती. त्यावेळी १२,५०० उमेदवार उपस्थित होते. मात्र, त्यानंतर आताचे चित्र पाहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील उमेदवारांमध्ये या भरतीबाबत उदासीनता दिसून येते. याउलट सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक सैन्य भरती होते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १० - १२ हजार जवान उपस्थित राहात असल्याचे कर्नल वर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, देश सेवा करण्याची ही एक अतिशय शुभ संधी आहे. मात्र, यासाठीही त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची कदर करूनच इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले मानधन मिळते, असे वर्मा म्हणाले.सैन्य भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना कर्नल वर्मा म्हणाले की, आता सैन्य भरतीची प्रक्रिया बदलली आहे. ही भरती प्रक्रिया नि:पक्षपाती, पारदर्शी स्वरूपाची होणार आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीचाही वापर होणार असल्याने बनावट उमेदवाराची निवड होण्याची शक्यता नाही. तसेच प्रत्येक चाचणीसाठी वेगवेगळे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत कुठल्याही दलालांना थारा मिळणार नाही. त्यामुळे निश्चित निवड होण्याचा दावा करून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांपासून सावध राहावे. यात पात्रतेनुसार निवड होणार असल्याचे कर्नल वर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अशी होणार सैन्यभरतीसैन्यभरतीचा जिल्हानिहाय कार्यक्रम असा : ८ फेब्रुवारी सिंंधुदुर्ग, ९ फेब्रुवारी सोलापूर, १० फेब्रुवारी रत्नागिरी, ११ फेब्रुवारी कोल्हापूर, १३ फेब्रुवारी सांगली. १४ फेब्रुवारी रोजी गोवा राज्यातील दोन जिल्हे आणि १५ फेब्रुवारी रोजी सातारा.२६ फेब्रुवारीला लेखी परीक्षाभरतीचे वैशिष्ट्य म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी सेवारत सैनिक, माजी सैनिक, युध्दविधवा, विधवापत्नी, त्यांचे पाल्य, खेळाडू व बाहेरील ेफड ढ४ल्ली यांनी सिद्ध केलेले व महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यातील कनिष्ठ अधिकारी (धर्मगुरु फक्त) यांच्याकरिता तसेच १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, गोवा व गुजरात या राज्यातील एज्युकेशन हवालदार करीताही यावेळी भरती होणार आहे. यावेळी निवड झालेल्यांची तसेच पूर्ण भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची १८ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर यात निवड झालेल्यांची २६ फेब्रुवारीला लेखी परीक्षा होणार आहे.