शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

रेशनिंग दुकानदार करणार आत्मदहन

By admin | Updated: April 27, 2015 04:08 IST

रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे

मुंबई : रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. परिणामी, एका आठवड्यात रेशनिंगवरील कमिशनवाढीवर निर्णय घेतला नाही, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय काही दुकानदारांनी घेतला आहे.या प्रकरणी मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू म्हणाले की, १० रेशनिंग दुकानदारांनी संघटनेला लेखी पत्र देऊन कमिशनवाढीची मागणी केली आहे. सध्या शासन नियमानुसार दुकानदारांना गहू आणि तांदूळ विक्रीत २० पैसे कमिशन मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन दुकानदारांना १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने गहू आणि १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देते. तेच धान्य दुकानदार स्वस्त अन्नधान्य योजनेअंतर्गत कार्डधारकांना प्रत्येकी २ व ३ रुपये प्रति किलो दराने विकतात. मात्र एफसीआयच्या गोदामापासून दुकानापर्यंत वाहतूक आणि हमाली खर्च पाहता दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २० पैशांचा भुरदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे २ रुपये प्रति किलो दराने विकणारे गहू दुकानदारांना ३ दराने विकत घ्यावे लागत आहेत. तर ३ रुपये प्रति किलो दराने विकत घेणारे तांदूळ दुकानदार ४ रुपये दराने विकत घेत आहेत. त्यामुळे कमिशन दूरच मात्र प्रति किलो गहू आणि तांदळासाठी दुकानदारांना १ रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीत सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. कमिशनवाढीबाबत एका आठवड्यात सरकारने निर्णय घ्यावा किंवा किमान सकारात्मक चर्चा करावी, अशी मागणी इशारा देणाऱ्या दुकानदारांची आहे. अन्यथा आठवड्यात कधीही मंत्रालयासमोर जाऊन गळ्यात पाटी अडकवून आत्मदहन करण्याचा दुकानदारांचा इरादा आहे.