शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

रेशनिंग दुकानदार करणार आत्मदहन

By admin | Updated: April 27, 2015 04:08 IST

रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे

मुंबई : रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि एपीएल कार्डधारकांच्या वर्षभरापासून बंद असलेल्या कोट्यामुळे रेशनिंग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. परिणामी, एका आठवड्यात रेशनिंगवरील कमिशनवाढीवर निर्णय घेतला नाही, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय काही दुकानदारांनी घेतला आहे.या प्रकरणी मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू म्हणाले की, १० रेशनिंग दुकानदारांनी संघटनेला लेखी पत्र देऊन कमिशनवाढीची मागणी केली आहे. सध्या शासन नियमानुसार दुकानदारांना गहू आणि तांदूळ विक्रीत २० पैसे कमिशन मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन दुकानदारांना १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने गहू आणि १ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देते. तेच धान्य दुकानदार स्वस्त अन्नधान्य योजनेअंतर्गत कार्डधारकांना प्रत्येकी २ व ३ रुपये प्रति किलो दराने विकतात. मात्र एफसीआयच्या गोदामापासून दुकानापर्यंत वाहतूक आणि हमाली खर्च पाहता दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २० पैशांचा भुरदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे २ रुपये प्रति किलो दराने विकणारे गहू दुकानदारांना ३ दराने विकत घ्यावे लागत आहेत. तर ३ रुपये प्रति किलो दराने विकत घेणारे तांदूळ दुकानदार ४ रुपये दराने विकत घेत आहेत. त्यामुळे कमिशन दूरच मात्र प्रति किलो गहू आणि तांदळासाठी दुकानदारांना १ रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीत सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. कमिशनवाढीबाबत एका आठवड्यात सरकारने निर्णय घ्यावा किंवा किमान सकारात्मक चर्चा करावी, अशी मागणी इशारा देणाऱ्या दुकानदारांची आहे. अन्यथा आठवड्यात कधीही मंत्रालयासमोर जाऊन गळ्यात पाटी अडकवून आत्मदहन करण्याचा दुकानदारांचा इरादा आहे.