शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

रेशन धान्य दुकानदारांचा दिल्लीत मोर्चा

By admin | Updated: March 18, 2015 00:50 IST

देशभरातील आंदोलनकर्ते : सार्वजनिक वितरण व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी

नवी दिल्ली : शांता कुमार समितीचा अहवाल रद्द करून सार्वजनिक वितरण व्यवस्था पूर्ववत करावी यांसह विविध मागण्यांसाठी देशभरातील रेशन धान्य दुकानदारांंनी मंगळवारी दिल्लीत भव्य मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.सार्वजनिक व्यवस्था सक्षम करावी, रेशन धान्य दुकानात गॅस सिलिंडर, पोस्टातील वस्तू तसेच अन्य वस्तूंची विक्री करण्याची परवानगी मिळावी अन्यथा रेशन धान्य दुकानदारांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या मागण्यांसाठी धान्य दुकानदारांनी रामलीला मैदानावरून संसदेवर हा मोर्चा नेला. मोर्चाचे जंतरमंतर येथे सभेत रूपांतर झाले. या सभेत बोलताना अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हादभाई मोदी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. रेशन व्यवस्था ही सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे. तीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. यामुळेच आज आम्हाला रस्त्यावर यावे लागले आहे. एवढे करूनही सरकार ऐकत नसेल तर देशव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मोदी यांनी दिला. या सभेत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचेही भाषण झाले. रेशन व्यवस्था सर्वसामान्यांसाठी आवश्यक बाब असल्याने याबाबत आम्ही संसदेत आवाज उठविला आहे. अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले. मोदी सरकार काही करण्याच्या नादात वेगळेच काही करत आहे. त्यामुळे या सरकारला पूर्ण बहुमत दिले, ही चूक झाली की काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. रेशन धान्य दुकानदारांच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास ५० खासदार आंदोलनाच्या पाठीशी उभे करू, अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. (प्रतिनिधी)प्रभूंच्या माळा प्रभू रामचंद्रांनी आपल्याला मदत केली म्हणून सर्व वानरसेनेला मोत्याच्या माळा देऊ केल्या, पण वानरांनी माळेत राम-सीता नसल्याचे पाहून माळा फेकून दिल्या. अशाच पद्धतीने हे सरकार गरिबांसाठी काहीही करणार नसेल, तर त्याला जनता फेकून देईल, असा इशाराही खासदार महाडिक यांनी दिला. यावेळी अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार विक्रेता महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख, सरचिटणीस विश्वंभर बसू, उपाध्यक्ष प्रल्हादभाई मोदी, महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र आंबुसकर, प्रभाकर पाडाळे, चंद्रकांत यादव आदींची भाषणे झाली. दिल्ली येथे मंगळवारी देशभरातील रेशन धान्य दुकानदारांंनी भव्य मोर्चा काढला. जंतरमंतर येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.