शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

By admin | Updated: May 4, 2015 01:39 IST

रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न

अहमदनगर : रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे सांगितले. राज्यातील पहिल्या बायोमेट्रिक धान्यवाटप उपक्रमाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ धान्य वितरणातील अडचणी दूर केल्या जातील. विभागाचे प्रमुख अधिकारी वितरणातील त्रुटी अभ्यासत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच धान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.धान्यातील काळाबाजाराला आळा बसला पाहिजे, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी सरकारने १०० कोटींची तरतूद केली़ राज्यातील पहिला प्रयोग नगरमध्ये होत असून, नगर जिल्हा धान्य वितरणात राज्यात आदर्श ठरला आहे़ जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या अधिकारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी होत आहे़ दुकानदारांनी नव्या पद्धतीला सहकार्य करावे़ दुकानदारांना धान्य वाटपाचे काम परवडत नाही, याची शासनाला जाणीव असून, कमिशन वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसेच तुटीचाही विचार केला जात असल्याचे बापट यांनी सांगितले.राज्यातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. ‘एपीएल’धारकांना धान्य देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे़ सर्वच स्तरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप केले जाईल़ मात्र त्याआधी धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील़ मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांचीही याबाबत लवकरच बैठक घेऊन वितरणात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचे पोट फाडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असा इशारा बापट यांनी दिला़ (प्रतिनिधी)