शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

By admin | Updated: May 4, 2015 01:39 IST

रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न

अहमदनगर : रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे सांगितले. राज्यातील पहिल्या बायोमेट्रिक धान्यवाटप उपक्रमाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ धान्य वितरणातील अडचणी दूर केल्या जातील. विभागाचे प्रमुख अधिकारी वितरणातील त्रुटी अभ्यासत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच धान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.धान्यातील काळाबाजाराला आळा बसला पाहिजे, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी सरकारने १०० कोटींची तरतूद केली़ राज्यातील पहिला प्रयोग नगरमध्ये होत असून, नगर जिल्हा धान्य वितरणात राज्यात आदर्श ठरला आहे़ जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या अधिकारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी होत आहे़ दुकानदारांनी नव्या पद्धतीला सहकार्य करावे़ दुकानदारांना धान्य वाटपाचे काम परवडत नाही, याची शासनाला जाणीव असून, कमिशन वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसेच तुटीचाही विचार केला जात असल्याचे बापट यांनी सांगितले.राज्यातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. ‘एपीएल’धारकांना धान्य देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे़ सर्वच स्तरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप केले जाईल़ मात्र त्याआधी धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील़ मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांचीही याबाबत लवकरच बैठक घेऊन वितरणात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचे पोट फाडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असा इशारा बापट यांनी दिला़ (प्रतिनिधी)