शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना कारावास

By admin | Updated: May 4, 2015 01:39 IST

रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न

अहमदनगर : रेशनच्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून ६ महिने कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे सांगितले. राज्यातील पहिल्या बायोमेट्रिक धान्यवाटप उपक्रमाचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.सर्वसामान्य नागरिकांना गरजेनुसार धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ धान्य वितरणातील अडचणी दूर केल्या जातील. विभागाचे प्रमुख अधिकारी वितरणातील त्रुटी अभ्यासत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच धान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.धान्यातील काळाबाजाराला आळा बसला पाहिजे, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी सरकारने १०० कोटींची तरतूद केली़ राज्यातील पहिला प्रयोग नगरमध्ये होत असून, नगर जिल्हा धान्य वितरणात राज्यात आदर्श ठरला आहे़ जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या अधिकारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी होत आहे़ दुकानदारांनी नव्या पद्धतीला सहकार्य करावे़ दुकानदारांना धान्य वाटपाचे काम परवडत नाही, याची शासनाला जाणीव असून, कमिशन वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसेच तुटीचाही विचार केला जात असल्याचे बापट यांनी सांगितले.राज्यातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. ‘एपीएल’धारकांना धान्य देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे़ सर्वच स्तरातील गोरगरिबांना धान्याचे वाटप केले जाईल़ मात्र त्याआधी धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील़ मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांचीही याबाबत लवकरच बैठक घेऊन वितरणात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचे पोट फाडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असा इशारा बापट यांनी दिला़ (प्रतिनिधी)