शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘राष्ट्रवादी’चे ‘छत्रपती’वर एकहाती वर्चस्व

By admin | Updated: April 27, 2015 23:50 IST

सभासदसंख्या मोठी, कार्यक्षेत्र मोठे, त्याचबरोबर जवळपास साडेसहा हजार बिगर ऊसउत्पादक सभासदांनी ‘सोमेश्वर’प्रमाणेच ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीतदेखील विरोधकांना झटका दिला.

विरोधकांचा आवाज क्षीण : बिगर ऊसउत्पादकांचा करिष्मा; विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभवबारामती : सभासदसंख्या मोठी, कार्यक्षेत्र मोठे, त्याचबरोबर जवळपास साडेसहा हजार बिगर ऊसउत्पादक सभासदांनी ‘सोमेश्वर’प्रमाणेच ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीतदेखील विरोधकांना झटका दिला. या बिगर ऊसउत्पादकांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, यासाठी विरोधक म्हणून पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने आवाज उठवला. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रचारात भर दिला. त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.विरोधकांमुळे कारखान्याची प्रगती थांबली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणा स्वत: राबविली. जाचक व त्यांच्या सहकाऱ्यांनीदेखील नियोजनबद्ध प्रचार केला. परंतु, तालुक्यातील माजी मंत्र्यांनी त्यांच्या कारखान्यात केलेल्या तडजोडीमुळे जाचक यांना आवश्यक रसद मिळाली नाही. त्यामुळे जाचक यांना एकाकी लढत द्यावी लागली. कारखान्यावरील कर्ज, सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याची खुंटलेली प्रगती आदींवर जाचक यांनी प्रचारावर भर दिला. या कारखान्याचे कार्यक्षेत्र इंदापूर व बारामती आहे. त्यामुळे बारामतीच्या मतदारांचा प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलवर राहिला. तसेच, बिगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मागील ५ ते ६ वर्षांपासून जाचक यांनी उचलून धरला होता. त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आघाडी सरकारने जाता जाता बिगर ऊस उत्पादकांच्या मतांचा अधिकार कायम ठेवला. त्याचा झटका सोमेश्वरप्रमाणे छत्रपतीच्या निवडणुकीत दिसून आला आहे. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, आर्थिकबाबतीत जाचक यांच्या श्री भवानीमाता पॅनल कमी पडल्याचे चित्र दिसून आले. सोमेश्वरच्या निवडणुकीनंतर छत्रपतीची निवडणूक यंत्रणा देखील अजित पवार यांनी स्वत: संभाळली. निवडणुकीतील तडजोडींना महत्त्व देऊन माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला. त्याचबरोबर तालुक्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘कर्मयोगी’ कारखान्याच्या निवडणुकीत हस्तक्षेप होणार नाही, असा अलिखित करारच केला होता काय, असे चित्र दिसून आले. कारण कर्मयोगीची निवडणूक एकतर्फी झाली. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी कर्मयोगीच्या निवडणुकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे विरोधक म्हणून छत्रपतीच्या निवडणुकीत लढत असलेल्या जाचक यांना पाटील यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. याच कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. स्वत: शेवटपर्यंत त्यांनी प्रचार सभांबरोबर मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील कारखान्याची निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न असल्याने विशेष लक्ष दिले. या कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. त्याचा फायदा उचलण्यात त्यांना यश आले. ‘माळेगाव’चा पराभव जिव्हारी लागलेल्या पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या. त्यानंतर छत्रपतीच्यादेखील सर्व जागा जिंकून या कारखान्याचा गडदेखील मोठ्या मतांच्या फरकाने राखला. सोमेश्वरप्रमाणे छत्रपतीची निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतली. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.४छत्रपतीच्या सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय प्रतीक आहे. वेगवेगळ्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन आरोप केले. मात्र, ‘छत्रपती’चा सभासद हा कोणाचे ऐकणारा नाही. सभासदांनी दाखविलेल्या या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. ४आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. याचा फायदा झाला. कारखान्याचा विस्तारवाढ, डिस्टिलरी उभारण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४कारखान्यावरील कर्ज, सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याची खुंटलेली प्रगती आदींवर जाचक यांनी प्रचारावर भर दिला. या कारखान्याचे कार्यक्षेत्र इंदापूर व बारामती आहे.