शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

उत्तर भारतीय एकगठ्ठा मतांसाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 21, 2017 02:28 IST

एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे

शेफाली परब,

मुंबई- युतीबाबत साशंकता, स्वबळावर शंभर जागा निवडून आणण्याचे भाजपाचे लक्ष्य, मित्रपक्षानेच शिवसेनेसमोर उभे केलेले आव्हान, एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशा वेळी निर्णायक ठरणाऱ्या उत्तर भारतीय मतांकडे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा वळवला आहे. विविध कार्यक्रम, मेळावे व समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते आपल्या बाजूने वळवण्याचे राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या मुद्द्याबरोबरच जातींचे समीकरण ही निवडणुकीत जमेची बाजू ठरत असते. एखाद्या समाजाची एकगठ्ठा मते पारड्यात पडल्यास त्या पक्षाच्या विजयाचा मार्ग सुकर होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या मुंबईत वाढत आहे. मतदानातही त्यांचा टक्का मोठा असल्याने त्यांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक मतदारांवरही भाजपा व इतर पक्षांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. >राजकीय पक्षांची नजर मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये दहिसर, कांदिवली, बोरीवली, मालाड येथील १८, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीमध्ये १८, उत्तर मध्य विभागात विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला येथे २३, उत्तर पूर्व परिसरात मुलुंड, भांडुप, घाटकोपर, गोवंडी, शिवाजीनगर या ठिकाणी २२, सायन-कोळीवाडा, धारावी तर दक्षिण मुंबईत वरळी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा अशा १०७ प्रभागांमधील उत्तर भारतीय मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे राजकीय पक्ष या प्रभागांमध्ये सक्रिय झाले आहेत. >काँग्रेस पक्षात सर्वाधिक दहा उत्तर भारतीय नगरसेवक आहेत. पारंपरिक मतदार हातून जाण्याच्या भीतीने काँग्रेसने या समाजासाठी स्वतंत्र अजेंडा राबवण्याची तयारी दाखवली आहे. हॉकर योजनेची अंमलबजावणी, १२ हजार उत्तर भारतीयांना टॅक्सीचा परवाना, कांदिवली-चांदिवलीत नेतृत्व उत्तर भारतीयांकडे सोपवण्यात आले आहे.