शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

तीन वर्षांत बलात्कार दुप्पट

By admin | Updated: January 16, 2016 01:26 IST

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत बलात्काराच्या गुन्ह्यांत दुप्पट तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत तीनपट वाढ झाली आहे. २०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत बलात्काराच्या गुन्ह्यांत दुप्पट तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत तीनपट वाढ झाली आहे. २०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे १७२४ गुन्हे समाविष्ट आहेत. शहरांच्या तुलनेत मुंबईत तर ग्रामीण भागाचा विचार करता अमरावती विभागात सर्वाधिक गुन्हे महिलांशी संबंधित आहेत. राज्यभरात २०१४मध्ये जेवढे गुन्हे नोंद झाले त्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण १०.६८ टक्के आहे.महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये बलात्काराच्या घटनांत १२.२४ टक्के तर विनयभंगांच्या गुन्ह्यांत २२.९८ टक्के वाढ झाली. याच कालावधीत अपहरणाच्या गुन्ह्यांत ३१.११ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तथापि, हुंडाबळीचे प्रमाण १२.८१ टक्क्यांनी खाली आले; तसेच महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे ४०.१६ टक्क्यांनी खाली आले.२०१४मध्ये महाराष्ट्रात महिलांविरुद्धच्या (१ लाख लोकसंख्येमागे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण) गुन्ह्यांचे प्रमाण ४७.५५ टक्के होते. ‘निर्भया प्रकरणाचा’ हा परिणाम असल्याचे महाराष्ट्र पोलीस मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाधिक महिला त्यांच्यावरील अत्याचाराची तक्रार करण्यास पुढे येत आहेत. खून, दरोडे आदी गुन्ह्यांत महिला बळी ठरल्या असल्यास ते गुन्हे महिलांविरुद्धचे समजले गेलेले नाहीत. जे गुन्हे फक्त महिलांबाबतच घडले आहेत त्यांनाच महिलांविरुद्धचे गुन्हे समजण्यात आले आहे.राज्यभरात २०१४मध्ये जेवढे गुन्हे नोंद झाले त्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण 10.68%२०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे गुन्हे1724२०१३च्या तुलनेत २०१४मध्ये बलात्काराच्या घटनांत १२.२४ टक्के तर विनयभंगांच्या गुन्ह्यांत २२.९८ टक्के वाढराज्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण47.55%