शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रणगाड्यांनी शत्रूच्या चौक्या केल्या उद्ध्वस्त; अहमदनगर येथे लष्कराची प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:37 IST

उपस्थितांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

निनाद देशमुख/नवनाथ खराडे अहमदनगर : आकाशातून वाऱ्याच्या वेगाने येत बॉम्ब टाकणारे हेलिकॉप्टर, कानठळ्या बसवणाºया तोफांद्वारे शत्रूवर भेदक मारा करत अचूक वेध घेणारे रणगाडे, चारही बाजूने होणारा गोळीबार...अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि जोश यामुळे भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यांवर ताबा मिळवत तिरंगा फडकवला. हा थरार सोमवारी उपस्थितांनी के. के. रेंज येथे प्रत्यक्ष अनुभवला.

लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे सोमवारी के.के रेंज वर आॅपरेशन ‘कवच प्रहार’ या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यात लष्कराच्या टँंक रेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता उपस्थितांनी अनुभवली. यावेळी आर्मड कोर अ‍ॅण्ड स्कूल अ‍ॅण्ड मॅकेनाइज्ड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा आणि मित्र राष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय लष्कराचे रणगाडे त्यांची मारक क्षमता आणि वेगवान हालचाली करण्याची क्षमता दाखवणासाठी तसेच डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि टेक्निकल स्टाफ आॅफिसर कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. तीन तास चाललेल्या या युद्ध सरावाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या भागात रणगाडे, बीएमपी वाहने आणि अटॅक हेलिकॉप्टर यांच्या यांत्रिक कौशल्याची माहिती देण्यात आली. दुसºया भागात रणगाडे आणि चिलखती वाहनांची माहिती देण्यात आली.अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरले आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.रणगाड्यांचे महत्त्व कायम - मेजर जनरल एस. झापहिल्या महायुद्धापासून युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो. शंभर वर्षांनंतरही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचाबीमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगला वापर होऊ शकतो. त्याद्वारे आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत मेजर जनरल एस झा यांनी सोमवारी व्यक्त केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान