शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज

By अतुल कुलकर्णी | Updated: March 13, 2018 05:47 IST

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींकडे शब्द टाकल्यामुळे केतकर यांना उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.केतकर अर्ज भरण्याअगोदर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बसले होते. तेथे राणे त्यांना भेटायला आले. समोर सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाहून काही क्षण राणे थबकले, नंतर त्यांनी केतकरांचे अभिनंदन केले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंचे अभिनंदन केले. पण शुभेच्छा घेताना राणेंच्या चेहºयावर हास्य नव्हतेच. राणेंना शोधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वळसेंच्या दालनात आले. त्यांना पाहून काँग्रेसच्या काही अतिउत्साही नेत्यांनी तुम्ही तीन अर्ज दाखल करणार की चार, असा सवाल केला. त्यावर ‘तुम्ही म्हणाल तसे करू!’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.>पर्याय नव्हतारविवार सायंकाळपर्यंत राणे अर्ज दाखल करण्यास तयार नव्हते; पण केंद्रातील एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून राणे यांचे मन वळवल्याचे समजते. राणेंना राज्यातच मंत्रिपद हवे होते. त्यासाठी ते अडून होते. मात्र, भाजपाने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे