शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज

By अतुल कुलकर्णी | Updated: March 13, 2018 05:47 IST

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींकडे शब्द टाकल्यामुळे केतकर यांना उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.केतकर अर्ज भरण्याअगोदर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बसले होते. तेथे राणे त्यांना भेटायला आले. समोर सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाहून काही क्षण राणे थबकले, नंतर त्यांनी केतकरांचे अभिनंदन केले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंचे अभिनंदन केले. पण शुभेच्छा घेताना राणेंच्या चेहºयावर हास्य नव्हतेच. राणेंना शोधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वळसेंच्या दालनात आले. त्यांना पाहून काँग्रेसच्या काही अतिउत्साही नेत्यांनी तुम्ही तीन अर्ज दाखल करणार की चार, असा सवाल केला. त्यावर ‘तुम्ही म्हणाल तसे करू!’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.>पर्याय नव्हतारविवार सायंकाळपर्यंत राणे अर्ज दाखल करण्यास तयार नव्हते; पण केंद्रातील एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून राणे यांचे मन वळवल्याचे समजते. राणेंना राज्यातच मंत्रिपद हवे होते. त्यासाठी ते अडून होते. मात्र, भाजपाने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे