शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज

By अतुल कुलकर्णी | Updated: March 13, 2018 05:47 IST

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींकडे शब्द टाकल्यामुळे केतकर यांना उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.केतकर अर्ज भरण्याअगोदर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बसले होते. तेथे राणे त्यांना भेटायला आले. समोर सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाहून काही क्षण राणे थबकले, नंतर त्यांनी केतकरांचे अभिनंदन केले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंचे अभिनंदन केले. पण शुभेच्छा घेताना राणेंच्या चेहºयावर हास्य नव्हतेच. राणेंना शोधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वळसेंच्या दालनात आले. त्यांना पाहून काँग्रेसच्या काही अतिउत्साही नेत्यांनी तुम्ही तीन अर्ज दाखल करणार की चार, असा सवाल केला. त्यावर ‘तुम्ही म्हणाल तसे करू!’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.>पर्याय नव्हतारविवार सायंकाळपर्यंत राणे अर्ज दाखल करण्यास तयार नव्हते; पण केंद्रातील एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून राणे यांचे मन वळवल्याचे समजते. राणेंना राज्यातच मंत्रिपद हवे होते. त्यासाठी ते अडून होते. मात्र, भाजपाने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे