शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

राणे थंडावले, काँग्रेसमध्येच राहणार

By admin | Updated: August 5, 2014 18:33 IST

काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय थंडावले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ५ - काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड थंडावले आहे. काँग्रेस हायकमांडकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळूनही नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राणेंनी मंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरु अशी घोषणाही राणेंनी केली आहे. 
मंगळवारी संध्याकाळी नारायण राणेंनी त्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 'काँग्रेसने अद्याप माझा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांशी मी गेल्या काही दिवसांत भेट घेतली. गेल्या वेळी झालेल्या चूका भविष्यात घडणार नाही असे आश्वासन मला काँग्रेस हायकमांडने दिल्याने मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे असे नारायण राणेंनी जाहीर केले. मात्र हायकमांडने नेमके काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे राणेंची पुन्हा एकदा बोळवणच  झाली असून त्यांचा बंड फसल्याचे दिसते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही असा आरोप करणारे नारायण राणेंनी आज यूटर्न घेतले. 'मला पदाची लालसा नाही. मी गेली अनेक वर्ष विविध पदांवर कार्यरत आहे. पदच माझ्यामागे धावून येतात असे राणेंनी सांगितले.  
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यात नेतृत्व बदल करावे अन्यथा पक्षाचा पराभव अटळ आहे. या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नाही असे सांगत नारायण राणेंनी दोन आठवड्यांपूर्वी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी विचारले असता नारायण राणे म्हणाले, मी काँग्रेसचा पराभव होईल असे म्हटले नव्हते. विधानसभेत काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन. 
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी नारायण राणेंच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राणेंच्या मनधरणीचे यशस्वी प्रयत्न केले. सुमारे तासभराच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राणेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राणे मोहन प्रकाश यांची भेट घेणार असून मोहन प्रकाश राणेंच्या मागण्यांवर दिल्लीत हायकमांडशी चर्चा करतील व हायकमांड त्यावर अंतिम निर्णय घेईल असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.