शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर, परंतु आझाद मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील ठाम
3
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
4
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
5
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
6
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
7
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
8
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
9
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
10
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
11
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
12
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
13
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
14
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
15
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
16
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
17
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
18
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
19
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
20
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

राणे थंडावले, काँग्रेसमध्येच राहणार

By admin | Updated: August 5, 2014 18:33 IST

काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय थंडावले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ५ - काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड थंडावले आहे. काँग्रेस हायकमांडकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळूनही नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राणेंनी मंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरु अशी घोषणाही राणेंनी केली आहे. 
मंगळवारी संध्याकाळी नारायण राणेंनी त्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 'काँग्रेसने अद्याप माझा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांशी मी गेल्या काही दिवसांत भेट घेतली. गेल्या वेळी झालेल्या चूका भविष्यात घडणार नाही असे आश्वासन मला काँग्रेस हायकमांडने दिल्याने मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे असे नारायण राणेंनी जाहीर केले. मात्र हायकमांडने नेमके काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे राणेंची पुन्हा एकदा बोळवणच  झाली असून त्यांचा बंड फसल्याचे दिसते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही असा आरोप करणारे नारायण राणेंनी आज यूटर्न घेतले. 'मला पदाची लालसा नाही. मी गेली अनेक वर्ष विविध पदांवर कार्यरत आहे. पदच माझ्यामागे धावून येतात असे राणेंनी सांगितले.  
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यात नेतृत्व बदल करावे अन्यथा पक्षाचा पराभव अटळ आहे. या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नाही असे सांगत नारायण राणेंनी दोन आठवड्यांपूर्वी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी विचारले असता नारायण राणे म्हणाले, मी काँग्रेसचा पराभव होईल असे म्हटले नव्हते. विधानसभेत काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन. 
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी नारायण राणेंच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राणेंच्या मनधरणीचे यशस्वी प्रयत्न केले. सुमारे तासभराच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राणेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राणे मोहन प्रकाश यांची भेट घेणार असून मोहन प्रकाश राणेंच्या मागण्यांवर दिल्लीत हायकमांडशी चर्चा करतील व हायकमांड त्यावर अंतिम निर्णय घेईल असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.