शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

राणे थंडावले, काँग्रेसमध्येच राहणार

By admin | Updated: August 5, 2014 18:33 IST

काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय थंडावले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ५ - काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड थंडावले आहे. काँग्रेस हायकमांडकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळूनही नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राणेंनी मंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरु अशी घोषणाही राणेंनी केली आहे. 
मंगळवारी संध्याकाळी नारायण राणेंनी त्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 'काँग्रेसने अद्याप माझा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांशी मी गेल्या काही दिवसांत भेट घेतली. गेल्या वेळी झालेल्या चूका भविष्यात घडणार नाही असे आश्वासन मला काँग्रेस हायकमांडने दिल्याने मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे असे नारायण राणेंनी जाहीर केले. मात्र हायकमांडने नेमके काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे राणेंची पुन्हा एकदा बोळवणच  झाली असून त्यांचा बंड फसल्याचे दिसते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही असा आरोप करणारे नारायण राणेंनी आज यूटर्न घेतले. 'मला पदाची लालसा नाही. मी गेली अनेक वर्ष विविध पदांवर कार्यरत आहे. पदच माझ्यामागे धावून येतात असे राणेंनी सांगितले.  
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यात नेतृत्व बदल करावे अन्यथा पक्षाचा पराभव अटळ आहे. या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नाही असे सांगत नारायण राणेंनी दोन आठवड्यांपूर्वी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी विचारले असता नारायण राणे म्हणाले, मी काँग्रेसचा पराभव होईल असे म्हटले नव्हते. विधानसभेत काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन. 
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी नारायण राणेंच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राणेंच्या मनधरणीचे यशस्वी प्रयत्न केले. सुमारे तासभराच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राणेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राणे मोहन प्रकाश यांची भेट घेणार असून मोहन प्रकाश राणेंच्या मागण्यांवर दिल्लीत हायकमांडशी चर्चा करतील व हायकमांड त्यावर अंतिम निर्णय घेईल असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.