शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

राणे राजकीय भूकंपाच्या तयारीत

By admin | Updated: June 3, 2014 02:29 IST

काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत.

काँग्रेसमध्ये टोकाची अस्वस्थता : दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार
अतुल कुलकर्णी - मुंबई
काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत. तशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळ विस्तारावरून ज्या पद्धतीच्या नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे ते स्वत:ही त्रस्त दिसत आहेत.
सोमवारी प्रस्तुत प्रतिनिधीने राणो यांची भेट घेतली असता ‘आज नाही, दोन-तीन दिवसांत सविस्तर बोलतो,’ असे सांगून  मनातल्या अस्वस्थतेला त्यांनी वाट करून दिली. मंत्रिमंडळ विस्तारावरून पडद्याआड मोठे राजकारण घडले. हतबल आणि प्रचंड नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री उशिरार्पयत दिल्लीशी संपर्क चालू ठेवला होता. काही करा, कोणालाही मंत्री करा; पण अधिवेशन सुरू होण्याच्या आधी शपथविधी करू द्या़ आधीच सरकारची आणि आपली व्यक्तिगत खूपच बदनामी होत आह़े त्यात शपथविधी झालाच नाही तर ते वाईट दिसेल, असे पटवून देण्यात रात्री उशिरा त्यांना यश आले आणि अखेर सोमवारी सकाळी शपथविधी पार पडला. मात्र विधान परिषदेवर पाठविण्यात येणा:या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांची यादी देखील अद्याप अंतिम करण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. 
मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत़ गेलो की शांतपणो ऐकून घेतात़ आपण यावर बैठक बोलावू म्हणतात आणि पुढे काहीच होत नाही, अशी जवळपास काँग्रेसच्या सर्वच मंत्री आणि आमदारांची भावना झाली आहे. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की फेरबदल, याकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. मात्र विस्तार झाला आणि मुख्यमंत्र्यांना अभय मिळाले, हे स्पष्ट झाल्यानंतर ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे -पाटील, नारायण राणो, पतंगराव कदम यांनी त्यांची नाराजी कुठे ना कुठे बोलून दाखवणो सुरू केले. काँग्रेसअंतर्गतच बंड करायचे आणि ताकद दाखवून द्यायची, अशा चर्चाही रंगू लागल्या. यापैकी राणो यांनीच आपली नाराजी स्पष्टपणो दाखवून दिली. 
नारायण राणो यांच्या गोटातून :
राणो यांच्या गोटातून मिळालेली माहिती वेगळीच आहे. त्यांच्या जवळच्या एका आमदाराने राणोंचीच कैफियत मांडली. तो म्हणाला, की गेली तीन-चार वर्षे राणो मित्रंच्या, पत्रकारांच्या सांगण्यावरून गप्प बसून होते. मात्र आता किती दिवस गप्प बसायचे. गप्प बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. उद्योगमंत्री या नात्याने त्यांनी केलेले औद्योगिक धोरण एक वर्षे मुख्यमंत्र्यांकडे तसेच पडून होते. पेपरमधून बातम्या आल्यानंतर ते वर्षभराने जशास तसे मंजूर करून पाठवले. जर काहीच दुरुस्त्या नव्हत्या तर कशाला एवढे दिवस लावले? एमआयडीसीमध्ये एसआरए योजना करण्याची फाइल देखील तशीच पडून ठेवली गेली. विजेच्या दरमाफीचा अहवाल तयार होऊनही तो नागपूर अधिवेशनात स्वीकारलाच नाही. त्यांच्या विभागाला मागितलेले अधिकारी देखील वेळेवर मिळत नसतील, तर मंत्री म्हणून राहण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त सवालही त्या आमदाराने केला.
 
अस्वस्थ नारायण राणो कोणती भूमिका घेणार, याविषयी कमालीचे मौन आहे. मात्र काँग्रेसमधील आमदारांचा एक गट राणो यांनी नेतृत्व कराव़े आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी भूमिका घेत आहे. अशा स्थितीत खरेच फाटाफूट होणार की राणो नवीनच समीकरण मांडणार, याकडे काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही लक्ष ठेवून आहेत. सूत्रंच्या दाव्यानुसार भाजपात जाण्याचा मार्गही राणो यांच्यासाठी खुला आहे.