शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राणे राजकीय भूकंपाच्या तयारीत

By admin | Updated: June 3, 2014 02:29 IST

काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत.

काँग्रेसमध्ये टोकाची अस्वस्थता : दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार
अतुल कुलकर्णी - मुंबई
काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत. तशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळ विस्तारावरून ज्या पद्धतीच्या नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे ते स्वत:ही त्रस्त दिसत आहेत.
सोमवारी प्रस्तुत प्रतिनिधीने राणो यांची भेट घेतली असता ‘आज नाही, दोन-तीन दिवसांत सविस्तर बोलतो,’ असे सांगून  मनातल्या अस्वस्थतेला त्यांनी वाट करून दिली. मंत्रिमंडळ विस्तारावरून पडद्याआड मोठे राजकारण घडले. हतबल आणि प्रचंड नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री उशिरार्पयत दिल्लीशी संपर्क चालू ठेवला होता. काही करा, कोणालाही मंत्री करा; पण अधिवेशन सुरू होण्याच्या आधी शपथविधी करू द्या़ आधीच सरकारची आणि आपली व्यक्तिगत खूपच बदनामी होत आह़े त्यात शपथविधी झालाच नाही तर ते वाईट दिसेल, असे पटवून देण्यात रात्री उशिरा त्यांना यश आले आणि अखेर सोमवारी सकाळी शपथविधी पार पडला. मात्र विधान परिषदेवर पाठविण्यात येणा:या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांची यादी देखील अद्याप अंतिम करण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. 
मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत़ गेलो की शांतपणो ऐकून घेतात़ आपण यावर बैठक बोलावू म्हणतात आणि पुढे काहीच होत नाही, अशी जवळपास काँग्रेसच्या सर्वच मंत्री आणि आमदारांची भावना झाली आहे. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की फेरबदल, याकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. मात्र विस्तार झाला आणि मुख्यमंत्र्यांना अभय मिळाले, हे स्पष्ट झाल्यानंतर ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे -पाटील, नारायण राणो, पतंगराव कदम यांनी त्यांची नाराजी कुठे ना कुठे बोलून दाखवणो सुरू केले. काँग्रेसअंतर्गतच बंड करायचे आणि ताकद दाखवून द्यायची, अशा चर्चाही रंगू लागल्या. यापैकी राणो यांनीच आपली नाराजी स्पष्टपणो दाखवून दिली. 
नारायण राणो यांच्या गोटातून :
राणो यांच्या गोटातून मिळालेली माहिती वेगळीच आहे. त्यांच्या जवळच्या एका आमदाराने राणोंचीच कैफियत मांडली. तो म्हणाला, की गेली तीन-चार वर्षे राणो मित्रंच्या, पत्रकारांच्या सांगण्यावरून गप्प बसून होते. मात्र आता किती दिवस गप्प बसायचे. गप्प बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. उद्योगमंत्री या नात्याने त्यांनी केलेले औद्योगिक धोरण एक वर्षे मुख्यमंत्र्यांकडे तसेच पडून होते. पेपरमधून बातम्या आल्यानंतर ते वर्षभराने जशास तसे मंजूर करून पाठवले. जर काहीच दुरुस्त्या नव्हत्या तर कशाला एवढे दिवस लावले? एमआयडीसीमध्ये एसआरए योजना करण्याची फाइल देखील तशीच पडून ठेवली गेली. विजेच्या दरमाफीचा अहवाल तयार होऊनही तो नागपूर अधिवेशनात स्वीकारलाच नाही. त्यांच्या विभागाला मागितलेले अधिकारी देखील वेळेवर मिळत नसतील, तर मंत्री म्हणून राहण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त सवालही त्या आमदाराने केला.
 
अस्वस्थ नारायण राणो कोणती भूमिका घेणार, याविषयी कमालीचे मौन आहे. मात्र काँग्रेसमधील आमदारांचा एक गट राणो यांनी नेतृत्व कराव़े आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी भूमिका घेत आहे. अशा स्थितीत खरेच फाटाफूट होणार की राणो नवीनच समीकरण मांडणार, याकडे काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही लक्ष ठेवून आहेत. सूत्रंच्या दाव्यानुसार भाजपात जाण्याचा मार्गही राणो यांच्यासाठी खुला आहे.