शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिल्लीपर्यंत भीक मागूनही राणेंचे हात रिकामेच ! - शिवसेनेचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:06 IST

भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत

रत्नागिरी/ औरंगाबाद : भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला. तर, भ्रष्टाचारी राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत म्हणाले, राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही आॅफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ‘महाराष्टÑ स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही; स्वाभिमान कशाशी खातात, हे माहिती नाही, त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार?‘स्वाभिमान’ या शब्दाची त्यांनी विटंबनाच केली आहे. ‘स्वाभिमान’ या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. उपकारांची परतफेड अपकाराने करायची दुसºयाच्या ताटामध्ये घाण करायची. कृतघ्नपणा करून राजकीय हैदोस घालायचा ही राणेंची संस्कृती आहे. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपाने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली़नीतेशकडे खरा स्वाभिमान!आमदार नीतेश राणेंकडे स्वाभिमान आहे. कारण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे खा. राऊत यांनी सांगितले असता ‘अजूनतरी’ असे म्हणायचे का, असे विचारताच ते म्हणाले की, नीतेश काँग्रेस पक्षात राहतील, कारण कॉँग्रेसमुळे ते आमदार झाले. राणे पक्ष काढत असताना नीतेशने पितृपे्रम बाजूला ठेवून कॉँग्रेसमध्येच राहणे पसंत केले, त्यामुळे हा त्यांचा खरा ‘स्वाभिमान’ आहे.दोन वेळा शिवसेनेने केले पराभूतजो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करीत होता, त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या उपभोगातून अमाप माया जमवणाºया नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका खा. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केली.पैशाच्या जीवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी, असे सांगून खैरे म्हणाले, त्यांनी आताही भाजपामध्ये जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले; मात्र भाजपावाल्यांनी का घेतले नाही? तरीही भाजपाने प्रवेश न दिल्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र असल्याचे खैरे यांनी सांगितले.राणेंकडून बुलेट ट्रेनचे समर्थनआधुनिक, नव्या गोष्टींना विरोध का, असा प्रश्न करीत बुलेट ट्रेनला विरोध करणाºया शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नारायण राणे यांनी मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. मात्र त्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना राणे यांनी चांगलीच दमछाक झाली, पण तरीही त्यांनी नेटाने बुलेट ट्रेनचे समर्थन केले. रेल्वेचा निधी कापून बुलेट ट्रेन येत नाही, त्यासाठी स्वतंत्र कर्ज घेतले आहे. शिवसेना आणि मनसेने आधी करारातील अटीशर्तींचा अभ्यास करावा आणि मगच बुलेट ट्रेनला विरोध करावा, अशी भूमिका राणे यांनी मांडली.सिंधुदुर्गात जल्लोषकणकवली (जि.सिंधुदुर्ग) : नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केल्याची घोषणा मुंबईत केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली येथील राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीसह फटाक्यांची आतषबाजी केली.राणे यांनी नवीन पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे. त्यांचा हा निर्णय आम्हांला संजीवनी देणारा आहे, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना