शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रामदासांनी पुराच्या पाण्यात काढले २० तास पाण्यात

By admin | Updated: September 23, 2016 14:59 IST

तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले.

बालाजी थेटे, ऑनलाइन लोकमत
औराद शहाजानी ( लातूर), दि. २३ -  तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले. रामदास खरटमोल असे त्या इसमाचे नाव आहे. 
मी नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शेतात गेलो. शेतातील म्हशीला चारण्यासाठी सोडले. दुपारी दीडच्या सुमारास अचानक मांजरा व तेरणा नदीला पूर आला आणि शेतातच पाणी घुसले. जीव वाचविण्यासाठी म्हैस, श्वानास उंचवट्यावर नेत होतो. पण वाढत्यामुळे उंचवट्याची धरणीही संपली. अखेर शेतातील चारपाईला म्हशीला बांधले आणि कुत्र्याला सोबत घेऊन झाडावर चढलो. त्यामुळे पुराच्या पाण्यात २० तास अडकून होतो. सुदैवाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावलो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथून वाहणा-या तेरणा व मांजरा नद्यांना पूर आला आहे. औराद शहाजानी येथील रामदास श्रीरंग खरटमोल (वय ३२) यांचे या नद्यांच्या पाच एकर काठावर शेती आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. म्हशीला चारण्यासाठी सोडले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांंना पाणी वाढले आणि त्यांच्या शेतातून पाणी वाहू लागले. काही मिनिटांतच चार एकर शेतात पाणी थांबल्याने जीव वाचविण्यासाठी दोन जनावरांसह औराद-वांजरखेडा रस्त्याच्या उंचवट्याकडे धाव घेतली. उंचवट्यावर थांबलो; पण मांजरा नदीचे २० फुटांपर्यंत पाणी चढले तर तेरणा नदीचे ५० फुटांपर्यंत पाणी वाढले. 
नजर फिरेल तिकडे पाणीच पाणी दिसू लागल्याने पुरातून बाहेर पडण्याचा मार्ग अंधारमय दिसू लागला. सोबत मोबाईल असल्याने कुटुंबियांना परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे आई, वडील, पत्नी व तीन मुले चिंताग्रस्त झाली. मी पाण्यातून सुखरुप बाहेर पडावा म्हणून कुटुंबियांनी देव पाण्यात ठेवून प्रार्र्थना करण्यास सुरुवात केली. 
दिवस जस जसा मावळू लागला, तस तसे पाणी वाढू लागले. शेतातील गोठा पाण्याखाली गेला. त्यामुळे काय करावे सुचेना. दोन जनावरांसह चारपाई घेऊन रस्त्यावरील उंचवट्यावर थांबलो. दरम्यान, पुराचे पाणी कमी होण्याऐवजी चढतच असल्याने अखेर म्हशीस चारपाईला बांंधून श्वानाला सोबत घेऊन झाडावर चढलो. दरम्यान, आपण पाण्यात अडकल्याची माहिती शेजारील शेतकरी शिवकुमार आग्रे व दिलीप कत्ते यांना दिली. 
रात्री झाली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. जीव मुठीत धरून झाडावरच बसून होतो. कुटुंबियांना बोलावे म्हटले तर मोबाईलची चार्चिंगही संपली. त्यामुळे जगाशी संपर्कच तुटला. कुटुंबियांची आठवण येऊ लागल्याने ही शेवटची घटका तर नाही, अशी शंका मनात येऊ लागली. सकाळ झाली आणि ९ वाजता गावातील धनसिंग भोई, रामसिंग भोई, परशुराम भोई, मोहनसिंह भोई हे टायरचे ट्यूब घेऊन माझ्याकडे येत असल्याचे पाहून जीवात जीव आला. त्यांनी मला ट्यूबवर बसवून सोबत म्हैस व श्वानास घेऊन पाण्यातून मार्ग काढीत बाहेर पडलो.