शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

रामदासांनी पुराच्या पाण्यात काढले २० तास पाण्यात

By admin | Updated: September 23, 2016 14:59 IST

तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले.

बालाजी थेटे, ऑनलाइन लोकमत
औराद शहाजानी ( लातूर), दि. २३ -  तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले. रामदास खरटमोल असे त्या इसमाचे नाव आहे. 
मी नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शेतात गेलो. शेतातील म्हशीला चारण्यासाठी सोडले. दुपारी दीडच्या सुमारास अचानक मांजरा व तेरणा नदीला पूर आला आणि शेतातच पाणी घुसले. जीव वाचविण्यासाठी म्हैस, श्वानास उंचवट्यावर नेत होतो. पण वाढत्यामुळे उंचवट्याची धरणीही संपली. अखेर शेतातील चारपाईला म्हशीला बांधले आणि कुत्र्याला सोबत घेऊन झाडावर चढलो. त्यामुळे पुराच्या पाण्यात २० तास अडकून होतो. सुदैवाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावलो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथून वाहणा-या तेरणा व मांजरा नद्यांना पूर आला आहे. औराद शहाजानी येथील रामदास श्रीरंग खरटमोल (वय ३२) यांचे या नद्यांच्या पाच एकर काठावर शेती आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. म्हशीला चारण्यासाठी सोडले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांंना पाणी वाढले आणि त्यांच्या शेतातून पाणी वाहू लागले. काही मिनिटांतच चार एकर शेतात पाणी थांबल्याने जीव वाचविण्यासाठी दोन जनावरांसह औराद-वांजरखेडा रस्त्याच्या उंचवट्याकडे धाव घेतली. उंचवट्यावर थांबलो; पण मांजरा नदीचे २० फुटांपर्यंत पाणी चढले तर तेरणा नदीचे ५० फुटांपर्यंत पाणी वाढले. 
नजर फिरेल तिकडे पाणीच पाणी दिसू लागल्याने पुरातून बाहेर पडण्याचा मार्ग अंधारमय दिसू लागला. सोबत मोबाईल असल्याने कुटुंबियांना परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे आई, वडील, पत्नी व तीन मुले चिंताग्रस्त झाली. मी पाण्यातून सुखरुप बाहेर पडावा म्हणून कुटुंबियांनी देव पाण्यात ठेवून प्रार्र्थना करण्यास सुरुवात केली. 
दिवस जस जसा मावळू लागला, तस तसे पाणी वाढू लागले. शेतातील गोठा पाण्याखाली गेला. त्यामुळे काय करावे सुचेना. दोन जनावरांसह चारपाई घेऊन रस्त्यावरील उंचवट्यावर थांबलो. दरम्यान, पुराचे पाणी कमी होण्याऐवजी चढतच असल्याने अखेर म्हशीस चारपाईला बांंधून श्वानाला सोबत घेऊन झाडावर चढलो. दरम्यान, आपण पाण्यात अडकल्याची माहिती शेजारील शेतकरी शिवकुमार आग्रे व दिलीप कत्ते यांना दिली. 
रात्री झाली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. जीव मुठीत धरून झाडावरच बसून होतो. कुटुंबियांना बोलावे म्हटले तर मोबाईलची चार्चिंगही संपली. त्यामुळे जगाशी संपर्कच तुटला. कुटुंबियांची आठवण येऊ लागल्याने ही शेवटची घटका तर नाही, अशी शंका मनात येऊ लागली. सकाळ झाली आणि ९ वाजता गावातील धनसिंग भोई, रामसिंग भोई, परशुराम भोई, मोहनसिंह भोई हे टायरचे ट्यूब घेऊन माझ्याकडे येत असल्याचे पाहून जीवात जीव आला. त्यांनी मला ट्यूबवर बसवून सोबत म्हैस व श्वानास घेऊन पाण्यातून मार्ग काढीत बाहेर पडलो.