शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:03 IST

Ramdas Athawale News: कोण छोटा, कोण मोठा असा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale News: आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेना शिंदे गटासह अन्य मित्र पक्षांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला. वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा, असे रामदास आठवले म्हणाले. 

वाद करण्यात आणि मिटवण्यातही आम्ही ॲक्टिव्ह आहोत. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली त्यात आमचा वाद मिटला. राज्यातील अनेक प्रश्न अद्यापही संपलेले नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. 

महाविकास आघाडीने त्याबाबत आम्हाला सांगू नये

सध्या जाहिरातीवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, असे उगाच वाद करत बसू नका. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली आणि वाद मिटला खरा. मात्र आम्ही वाद करण्यात अॅक्टिव्ह आहोत तसेच वाद मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत हे दिसून आले आहे. महाविकास आघाडीने त्याबाबत आम्हाला सांगू नये, असा पलटवार रामदास आठवले यांनी केला. तसेच महाराष्ट्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. दीड-दोन वर्षाचा काळ निवडणुकीला राहिलेला आहे. एकाच मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा. महामंडळांवर नियुक्ती करण्यात याव्यात. लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत. हे करत असताना आमच्याही पक्षाला गृहित धरुन मंत्रिमंडळात समावेश करुन घ्यावा. त्यांना हीच विनंती आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी समसमान आहेत. कोण छोटा, कोण मोठा हा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे. सध्या दलित अत्याचाराच्या घटना वाढता आहेत, यासाठी काम करावे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला होता. त्यांच्यासाठी पंधराशे कोटीचा निधी मंजूर केला आहे, तो तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आपापसांत वाद करत बसू नये. एकत्र काम करावे अशी आमची भूमिका आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस