शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:12 IST

Rajya Sabha Election 2022: निवडणूक कशी जिंकायची ते देवेंद्र फडणवीस यांनी शिकविले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

मुंबई: तब्बल २४ वर्षानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. यातच आता रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करत, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय माहडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजप आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता. प्रत्यक्षात मात्र या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. महाडिक यांना ४१ मते मिळाली तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या स्मार्ट खेळीचे भाजप नेत्यांकडून कौतुक केले जात आहे. यात आता रामदास आठवले यांची भर पडली आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली

रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती फडणवीस यांनी शिकविली आहे. फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे, अशी बोचरी टीका करत रामदास आठवले यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, भाजपला शुभेच्छा. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही, याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस