शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रामराजे बारामतीकरांचे लोलकमंत्री !

By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST

उदयनराजेंचा घणाघात : मला डिवचू नका; नाही तर कुलंगडी-भानगडी बाहेर येतील

सातारा : जिल्हा नियोजन समितीत जनतेचे प्रश्न मांडल्याबद्दल काहींना पोटशूळ उठला. त्यामुळे द्वेषभावनेतून त्यांनी एक-दोन कार्यक्रमांत आमचा उल्लेख ‘अतिरिक्त पालकमंत्री’ म्हणून केला. ते महाशय १९९५ पासून बारामतीकरांची तळी उचलून, मंत्रिपद टिकवून होते. मागच्या दाराने आमदार झाल्यानंतरचा काही काळ ते सातारचे पालकमंत्री होते. पालकमंत्री म्हणून काम करताना ते फक्तमान डोलावणारे आणि बारामतीकरांचा लोलक सांभाळणारे ‘लोलक-डोलक मंत्री’ होते,’ अशी टिका खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केली.उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी जनतेचे प्रश्न मांडले. पाटबंधारे विभागातील अनियमितता मांडली. त्यावर कारवाईची मागणी केली. त्यामध्ये काहीच चुकीचे नव्हते. जनतेच्या पैशांचा दुरुपयोग झाला असेल, तर त्यावर चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे. परंतु, काही व्यक्तींना त्यांच्या भानगडी, कुलंगडी बाहेर निघतील याची भीती वाटल्याने त्यांनी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा उपहासात्मक उल्लेख केला असावा.या बैठकीत मी राजशिष्टाचारानुसार पालकमंत्र्यांच्या बरोबरीने डायसवर जागा नेमून दिलेल्या ठिकाणी बसलो होतो. आमदार शशिकांत शिंदे पालकमंत्री होते त्यावेळेस व त्यापूर्वीही त्याच ठिकाणी बसलो होतो. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. फलटण किंवा एका तालुक्याचे म्हणून तेथे बसत नाही. यापूर्वी बोलावेसे वाटलेच नाही. मात्र, शिंदे यांच्या काळात कृषी विद्यापीठाचा ठराव मांडला व तो एकमताने मंजूर केला. तथापि, त्याची फक्त इतिवृत्तात नोंद घेण्यात आली म्हणून ठराव स्वरूपात तो पुन्हा मांडण्यात आला तो जनतेच्या हितासाठी. याचाच अर्थ पालकमंत्र्यांच्या शेजारी बसून मी प्रथमच बोललो नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत खरी भूमिका मांडल्यानेच त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि माझा उल्लेख ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा करण्याबरोबरच ते आपल्या कार्यकर्त्यांना रक्त सांडायच्या गोष्टी करू लागले आहेत, असेही उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)आज होणार गौप्यस्फोट?महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणातही झपाट्याने बदल होत आहेत. गेली पाच वर्षे शांत राहिलेले खासदार उदयनराजे अत्यंत आक्रमक झाले असून, रामराजे नाईक-निंबाळकर व शशिकांत शिंदे यांच्यासोबत त्यांच्या सतत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अतिरिक्त पालकमंत्री म्हणून उदयनराजेंचा उल्लेख केला गेल्यानंतर उदयनराजे गट संतप्त झाला असून, गेल्या पाच वर्षांतील माजी मंत्र्यांच्या अनेक कामांमधील घोटाळे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. ४) महाबळेश्वर येथे एका मोठ्या गौप्यस्फोटाची शक्यता आहे.आमच्या वाटेला येऊ नकायेथून पुढे या माजी पालक तथा डोलकमंत्र्यांनी कोणाला तरी खूश करण्यासाठी किंवा कुणाच्या तरी तळी उचलण्यासाठी, अनावधनानेही उल्लेख करून, हात दाखवून अवलक्षण करण्याचा योग आणू नये. लोकांवर अन्याय झालेली अनेक प्रकरणे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. तथापि, आम्ही तुमच्या वाटेत नाही, तर आमच्याही वाटेत येऊ नका, असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.