शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

राम जन्मला १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८ साली

By admin | Updated: April 3, 2017 02:33 IST

दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो

मुंबई : दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो, परंतु इंग्रजी - ग्रेगरियन तारखेप्रमाणे श्रीरामाचा जन्म कधी झाला, हे आपणास माहीत नसते. मात्र, आता हा इतिहास गवसला आहे. कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात उल्लेख केलेल्या खगोलीय घटनांचा अभ्यास आणि संशोधन करून, रामायणातील घटनांचा काल शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मेंडकी यांनी संशोधनाद्वारे श्रीराम जन्माची तारीख १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८, चैत्र शुक्ल नवमी असल्याचे दाखविले आहे, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.प्रफुल्ल मेंडकी यांच्या संशोधनाविषयी माहिती देताना सोमण म्हणाले की, आतापर्यंत अनेक विद्वानांनी रामायणाचा काल निश्चित करण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मतभिन्नताच आढळते, त्या वेळी संगणक उपलब्ध नव्हता. प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन करीत असताना, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)>महाभारतावरही संशोधनपुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. मेंडकी यांनी महाभारत कालावरदेखील संशोधन केले असून, तेही पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.>भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त संशोधनमेंडकी यांचे हे संशोधन पुढील काळात अधिक संशोधन करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सोमण यांनी व्यक्त केला. सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणातील या घटनांचा काल ठरविणे हे खूप कठीण काम आहे. कदाचित काही ठिकाणी खगोलीय घटनांचा उल्लेख सापडलाही नसेल, सध्या गृहित धरल्या गेलेल्या गोष्टींशी संशोधित निष्कर्ष जुळत नसतील, परंतु प्रफुल्ल मेंडकी यांनी प्रामाणिकपणे रामायणात उल्लेखल्या गेलेल्या खगोलीय घटनांचा आधार घेऊन, संशोधनाचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे, असेही सोमण यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे, रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार प्रफुल्ल मेंडकी यांनी हे संशोधन करताना केलेला आहे. कालमानाचे हे गणित करीत असताना, ‘डेल्टा टी’ नावाची कालशुद्धी करावी लागते. त्यामुळे गणितात अचूकता येत असते, तीही त्यांनी रामायणकाल ठरविताना केली आहे.