शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

राम जन्मला १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८ साली

By admin | Updated: April 3, 2017 02:33 IST

दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो

मुंबई : दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो, परंतु इंग्रजी - ग्रेगरियन तारखेप्रमाणे श्रीरामाचा जन्म कधी झाला, हे आपणास माहीत नसते. मात्र, आता हा इतिहास गवसला आहे. कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात उल्लेख केलेल्या खगोलीय घटनांचा अभ्यास आणि संशोधन करून, रामायणातील घटनांचा काल शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मेंडकी यांनी संशोधनाद्वारे श्रीराम जन्माची तारीख १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८, चैत्र शुक्ल नवमी असल्याचे दाखविले आहे, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.प्रफुल्ल मेंडकी यांच्या संशोधनाविषयी माहिती देताना सोमण म्हणाले की, आतापर्यंत अनेक विद्वानांनी रामायणाचा काल निश्चित करण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मतभिन्नताच आढळते, त्या वेळी संगणक उपलब्ध नव्हता. प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन करीत असताना, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)>महाभारतावरही संशोधनपुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. मेंडकी यांनी महाभारत कालावरदेखील संशोधन केले असून, तेही पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.>भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त संशोधनमेंडकी यांचे हे संशोधन पुढील काळात अधिक संशोधन करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सोमण यांनी व्यक्त केला. सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणातील या घटनांचा काल ठरविणे हे खूप कठीण काम आहे. कदाचित काही ठिकाणी खगोलीय घटनांचा उल्लेख सापडलाही नसेल, सध्या गृहित धरल्या गेलेल्या गोष्टींशी संशोधित निष्कर्ष जुळत नसतील, परंतु प्रफुल्ल मेंडकी यांनी प्रामाणिकपणे रामायणात उल्लेखल्या गेलेल्या खगोलीय घटनांचा आधार घेऊन, संशोधनाचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे, असेही सोमण यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे, रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार प्रफुल्ल मेंडकी यांनी हे संशोधन करताना केलेला आहे. कालमानाचे हे गणित करीत असताना, ‘डेल्टा टी’ नावाची कालशुद्धी करावी लागते. त्यामुळे गणितात अचूकता येत असते, तीही त्यांनी रामायणकाल ठरविताना केली आहे.