शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

राममंदिर संतच बांधणार

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे,

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची माहितीनागपूर: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे, असे ज्योतिषपीठ व द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.अयोध्येत तीनही शंकराचार्यांद्वारा समर्थित रामालय ट्रस्ट हे मंदिराचे बांधकाम करणार असून ते कंबोडियातील अकराशे वर्षे जुन्या श्रीराम मंदिराच्या धर्तीवर असेल. विश्व हिंदू परिषदेला मात्र बिर्ला मंदिराप्रमाणे हे मंदिर बांधायचे आहे, असे शंकराचार्य म्हणाले. शिर्डी येथे होणाऱ्या साई समाधी शताब्दी महोत्सवाला त्यांनी विरोध केला. साईबाबांचा महोत्सव साजरा केल्यास सार्इंच्या नावाने हिंदू समाजात अंधविश्वास पसरेल, असे ते म्हणाले. साईबाबांना हिंदू देव-देवतांप्रमाणे सादर करण्याचा कट भारतच नव्हे तर विदेशातूनही रचला जात आहे. विष्णू, सरस्वती,श्रीकृष्ण यांच्या चित्रांवर साईबाबांचा चेहरा लावून त्यांना देवतेच्या रूपात सादर केले जाते. अशा प्रकारचे दोन संकेतस्थळ मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून संचालित होत आहे. यावर तत्काळ प्रतिबंध घालावा अशी मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सागितले. अलाहाबाद कुंभ मेळाव्यात झालेल्या धर्म संसदेत हिंदू धर्माच्या हितार्थ नऊ प्रस्ताव पारित करण्यात आले होते. त्यात हिंदू धर्मापुढे असलेल्या समस्यां विरुद्ध लढण्याची तयारी करणे, गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी त्यावर कुठलाही बांध न बांधणे, नाले बंद करणे, संपूर्ण देशात गोहत्या बंदी, सनातन हिंदू धर्माचे साईकरण बंद करावे, ‘पी.के.’चित्रपट रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला जबाबदार धरणे, हिंदूंचे धर्मांतरण समग्र स्वरूपात व्हावे, भारताची मूळ भाषा संस्कृतला प्रोत्साहन द्यावे आदींचा त्यात समावेश होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)हिंदू मुलांची संख्या वाढविणे उपाय नाहीराजकीय दृष्टिकोन ठेवून हिदूंनी मुलांची संख्या वाढविली तर प्रतिस्पर्धी अल्पसंख्यक समाजही त्याचे अनुकरण करेल. यामुळे लोकसंख्येचा स्फोट होईल. लोकसंख्या संतुलित ठेवायची असेल तर अन्य धर्मीयांनाही हिंदूं धर्माप्रमाणेच कुटुंब नियोजनाचा नियम लागू करावा,असे शंकराचार्य म्हणाले. जोपर्यंत मन आणि आचरणाने शुद्ध होत नाही तोपर्यंत ‘घर वापसी’च्या नावावर दुसऱ्यांचे धर्मांतरण करणे उपयोगी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.