शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर आज नाही तर कधीच नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 13, 2016 12:12 IST

शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार असा सवाल उद्धवनी मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  ' शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार?' असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राममंदिराची उभारणी करण्याचे फर्मान सोडले आहे. ' राममंदिर आज नाही तर कधीच नाही. नुसते नारे देऊ नका, विटा रचायला सुरुवात करा. कळस चढवायचे काम शिवसेना करीलच' असेही उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. 
उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा असल्याची आठवण करून देतानाच राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे,  आता त्यावर वेळ वाया न घालवता हे काम तडीस न्यावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
(‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा तेवढाच - उद्धव ठाकरे)
(राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला)
 
 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. लखनौ येथे दसरा मेळावा घेऊन पंतप्रधानांनी जय श्रीरामाचा नारा दिला आहे. मोदी यांनी व्यासपीठावरून दोन वेळा ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा ‘शंख’ फुंकला आहे. उत्तर प्रदेशात किती हालचाली झाल्या ते लवकरच कळेल. उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे.
 
-  स्वत: मोदी हे वाराणसी येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत व पंतप्रधान होताच त्यांनी काशीला येऊन गंगा आरती केली. त्यामुळे ‘भाजप’ची छाती फुगली व हिंदुत्ववाद्यांची मनगटे फुरफुरली नसती तर नवलच. आतापर्यंत पंतप्रधान होताच नेते मशिदींचे दर्शन घेत. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारीत, पण मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे की, त्यांनी शपथ घेताच गंगा आरतीचे प्रयोजन केले व त्याचा चांगलाच परिणाम झाला. मोदी यांना त्यावेळीच विचारले होते की, ‘आता राममंदिर केव्हा?’ तेव्हा ठोस उत्तर रामभक्तांना मिळाले नाही. कारण लोकसभा विजयाचा जोश होता. पण आता त्या विजयाचा जोश संपला आहे व विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झाल्याने माहौल तयार झाला आहे. त्यामुळेटविधानसभेसाठी ‘जय श्रीराम’चा नारा झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. 
 
- पंतप्रधानांनी लखनौला येऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिराची स्थापना होऊन सोन्याचा कळस चढेल या भावनेतून भाजपला मते मिळतील व राममंदिर झाले नाही तरी उत्तर प्रदेशात सत्तामंदिरी कमलपुष्पांचे अर्पण होईल. या भावनेतून सर्व चालले आहे. राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे. आता किती राजकारण करायचे ते एकदा ठरवून टाका.