शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर आज नाही तर कधीच नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 13, 2016 12:12 IST

शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार असा सवाल उद्धवनी मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  ' शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार?' असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राममंदिराची उभारणी करण्याचे फर्मान सोडले आहे. ' राममंदिर आज नाही तर कधीच नाही. नुसते नारे देऊ नका, विटा रचायला सुरुवात करा. कळस चढवायचे काम शिवसेना करीलच' असेही उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. 
उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा असल्याची आठवण करून देतानाच राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे,  आता त्यावर वेळ वाया न घालवता हे काम तडीस न्यावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
(‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा तेवढाच - उद्धव ठाकरे)
(राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला)
 
 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. लखनौ येथे दसरा मेळावा घेऊन पंतप्रधानांनी जय श्रीरामाचा नारा दिला आहे. मोदी यांनी व्यासपीठावरून दोन वेळा ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा ‘शंख’ फुंकला आहे. उत्तर प्रदेशात किती हालचाली झाल्या ते लवकरच कळेल. उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे.
 
-  स्वत: मोदी हे वाराणसी येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत व पंतप्रधान होताच त्यांनी काशीला येऊन गंगा आरती केली. त्यामुळे ‘भाजप’ची छाती फुगली व हिंदुत्ववाद्यांची मनगटे फुरफुरली नसती तर नवलच. आतापर्यंत पंतप्रधान होताच नेते मशिदींचे दर्शन घेत. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारीत, पण मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे की, त्यांनी शपथ घेताच गंगा आरतीचे प्रयोजन केले व त्याचा चांगलाच परिणाम झाला. मोदी यांना त्यावेळीच विचारले होते की, ‘आता राममंदिर केव्हा?’ तेव्हा ठोस उत्तर रामभक्तांना मिळाले नाही. कारण लोकसभा विजयाचा जोश होता. पण आता त्या विजयाचा जोश संपला आहे व विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झाल्याने माहौल तयार झाला आहे. त्यामुळेटविधानसभेसाठी ‘जय श्रीराम’चा नारा झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. 
 
- पंतप्रधानांनी लखनौला येऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिराची स्थापना होऊन सोन्याचा कळस चढेल या भावनेतून भाजपला मते मिळतील व राममंदिर झाले नाही तरी उत्तर प्रदेशात सत्तामंदिरी कमलपुष्पांचे अर्पण होईल. या भावनेतून सर्व चालले आहे. राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे. आता किती राजकारण करायचे ते एकदा ठरवून टाका.