शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

राम मंदिर आज नाही तर कधीच नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 13, 2016 12:12 IST

शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार असा सवाल उद्धवनी मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  ' शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार?' असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राममंदिराची उभारणी करण्याचे फर्मान सोडले आहे. ' राममंदिर आज नाही तर कधीच नाही. नुसते नारे देऊ नका, विटा रचायला सुरुवात करा. कळस चढवायचे काम शिवसेना करीलच' असेही उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. 
उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा असल्याची आठवण करून देतानाच राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे,  आता त्यावर वेळ वाया न घालवता हे काम तडीस न्यावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
(‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा तेवढाच - उद्धव ठाकरे)
(राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला)
 
 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. लखनौ येथे दसरा मेळावा घेऊन पंतप्रधानांनी जय श्रीरामाचा नारा दिला आहे. मोदी यांनी व्यासपीठावरून दोन वेळा ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा ‘शंख’ फुंकला आहे. उत्तर प्रदेशात किती हालचाली झाल्या ते लवकरच कळेल. उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे.
 
-  स्वत: मोदी हे वाराणसी येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत व पंतप्रधान होताच त्यांनी काशीला येऊन गंगा आरती केली. त्यामुळे ‘भाजप’ची छाती फुगली व हिंदुत्ववाद्यांची मनगटे फुरफुरली नसती तर नवलच. आतापर्यंत पंतप्रधान होताच नेते मशिदींचे दर्शन घेत. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारीत, पण मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे की, त्यांनी शपथ घेताच गंगा आरतीचे प्रयोजन केले व त्याचा चांगलाच परिणाम झाला. मोदी यांना त्यावेळीच विचारले होते की, ‘आता राममंदिर केव्हा?’ तेव्हा ठोस उत्तर रामभक्तांना मिळाले नाही. कारण लोकसभा विजयाचा जोश होता. पण आता त्या विजयाचा जोश संपला आहे व विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झाल्याने माहौल तयार झाला आहे. त्यामुळेटविधानसभेसाठी ‘जय श्रीराम’चा नारा झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. 
 
- पंतप्रधानांनी लखनौला येऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिराची स्थापना होऊन सोन्याचा कळस चढेल या भावनेतून भाजपला मते मिळतील व राममंदिर झाले नाही तरी उत्तर प्रदेशात सत्तामंदिरी कमलपुष्पांचे अर्पण होईल. या भावनेतून सर्व चालले आहे. राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे. आता किती राजकारण करायचे ते एकदा ठरवून टाका.