शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नंदुरबारात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 17:33 IST

मुस्लिम समाजाला राज्य शासनाने पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती़ न्यायालयानेही हे आरक्षण वैध ठरवले होते. मात्र या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही शासन

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि.18 -  मुस्लिम समाजाला राज्य शासनाने पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती़ न्यायालयानेही हे आरक्षण वैध ठरवले होते. मात्र या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही शासन मुस्लिम समाजाला आरक्षण देत नाही, हा अध्यादेश तात्काळ लागू केला जावा, या मागणीसाठी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.शहरातील इलाही चौकातून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली़. मोर्चाची वेळ ११ वाजेची असली तरी, याठिकाणी आठ वाजेपासून दोन-दोनच्या रांगेत युवक व नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते. नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजबांधव स्वच्छेने येऊन रांगेत जागा घेत होते. ईलाही चौक ते मच्छीबाजार या दरम्यान मोठी रांग लावण्यात आली होती़. जमात-उलेमा-ए-ंिहंद व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. एक तास सुरू असलेल्या या मोर्चात कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता, केवळ मूकपणे मागण्यांचे फलक युवक दाखवत होते़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित जमाए-उलेमा-ए-हिंद या संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मौलाना जकेरिया रहेमानी यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी जमात-उलेमा-ए-हिंद या संघटनेने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर तालुकास्तराव धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.