शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान

By admin | Updated: May 14, 2016 02:37 IST

राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान आहे. अनेक गोष्टी इथे शिकता आल्या. संसदीय कारकिर्दीत दिवंगत उपराष्ट्रपती कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान आहे. अनेक गोष्टी इथे शिकता आल्या. संसदीय कारकिर्दीत दिवंगत उपराष्ट्रपती कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत व विद्यमान सभापती हमीद अन्सारी यांची तसेच ओजस्वी वक्ते अटल बिहारी वाजपेयी, महान अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांची कारकिर्द जवळून अनुभवता आली याचा अतिशय भावपूर्ण शब्दांत उल्लेख विजय दर्डांनी निवृत्त सदस्यांच्या समारोप सोहळ्यात केला. यानिमित्ताने सभागृहाला एक शेरही दर्डांनी ऐकवला.मुझको चलने दो अकेला.. अभी बाकी है मेरा सफर...रास्ता अगर रोका गया, तो कारवाँ हो जाउँगा.....अठरा वर्षांपूर्वी या सभागृहात मी पहिल्यांदा आलो तेव्हा भारताच्या तिरंगी झेंड्याचा बिल्ला लावून राज्यसभेच्या सभागृहात तुम्हाला येता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेला तिरंग्याचा बिल्ला सभागृहातही लावण्यास सदस्यांना अनुमती असली पाहिजे, याचा आग्रह तेव्हापासून आजतागायत मी धरला. दुर्दैवाने राज्यसभेत आजही हा मुद्दा अनिर्णीतच आहे, याची मला खंत आहे. भविष्यकाळात तरी या विषयाचा निर्णय सभागृहाने अग्रक्रमाने घ्यावा, असे आग्रही प्रतिपादन खासदार दर्डांनी आपल्या भाषणात केले.आदर्श संसदीय परंपरा, कोट्यवधी जनतेच्या आशा-आकांक्षा, देशाचा स्वाभिमान, भिन्न राजकीय विचारसरणी असली तरी संसदेच्या कामकाजात सामुदायिक शहाणपणा (कलेक्टिव्ह विस्डम)चे वैभव, राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तरुण पिढीच्या अपेक्षा आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचे भारतीय राजकारणातले अतुलनीय महत्त्व खा. दर्डांनी आपल्या भाषणात नमूद केले. संसदीय कामकाजात गोंधळ, गदारोळ ही नित्याची बाब झाली तरी महत्त्वाचे प्रश्न हे चर्चेतूनच सुटतात. म्हणूनच राज्यसभेसारख्या ज्येष्ठांच्या सभागृहाने चर्चा (डिबेट)ला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मतही याप्रसंगी दर्डांनी नोंदवले.यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, देशातल्या तरुण पिढीचे आशास्थान राहुल गांधी व काँग्रेसच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत दर्डांनी या सर्वांसह सभापती हमीद अन्सारी, उपसभापती कुरियन, सभागृहाचे नेते अरुण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा आणि राज्यसभा सचिवालयाचे सचिव, तमाम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दीर्घ कारकिर्दीत केलेल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.समारोप कार्यक्रमाच्या शेवटी सभागृहाचे नेते अरुण जेटलींचे भाषण झाले. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या आठवणीचे विविध प्रसंग नमूद करीत जेटली म्हणाले, विचारसरणी आणि पक्ष भिन्न असले तरी सार्वजनिक जीवनातली मैत्री अखंड आहे. सभागृहाचे सदस्यत्व संपत असले तरी सार्वजनिक जीवनातून कोणीही निवृत्त होत नाही. कुठल्या तरी वाटेवर कधी ना कधी आपली भेट होईलच. सभागृहातल्या सुखद स्मृती मनात साठवीत आपल्या आयुष्याचा पुढला प्रवास सुखद होवो, अशा शुभेच्छाही जेटलींनी याप्रसंगी दिल्या.