शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 20:02 IST

शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांवर होणाऱ्या निवडणुकीतील मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना एकाच छताखाली आणत आहे. मतदानात कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी पक्ष खबरदारी घेत आहे. शिवसेनेने या निवडणुकीत २ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे. कधी ट्रायडंट तर कधी रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार राहत आहेत. २ दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटला पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे १ आमदार गैरहजर होते. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही या आमदाराने उपस्थिती लावली नाही. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गैरहजर राहणाऱ्या शिवसेना आमदाराचं नाव तानाजी सावंत असं आहे. 

तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा पहिल्यांदाच होते असं नाही. यापूर्वीही तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीत शिवसेनेचा अपमान होतोय त्यामुळे पक्षप्रमुखांनी विचार करावा असं विधान केले होते. मंत्रिपद मिळत नसल्यानेही तानाजी सावंत(Tanaji Sawant) नाराज असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर महाविकास आघाडीत असूनही सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आपल्या सडेतोड वक्तव्यांनी सातत्याने अडचणीत येणारे तानाजी सावंत हल्ली माध्यमांसमोर येत नाहीत. त्यात राज्यसभा निवडणूक इतकी महत्त्वाची असताना पक्षाच्या बैठकीला दांडी लावल्याने तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न निर्माण होतो.

अलीकडे शिवसंपर्क अभियानानिमित्त तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेत म्हटलं होतं की, सहा महिनेच मंत्री होतो या कडेपासून त्या कडेपर्यंतच्या जिल्ह्याने आपली कार्यपद्धती पाहिली आहे. पक्षाचा आदेश आला आणि आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केले. राज्यात जवळपास ७० टक्के जागांवर शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात लढा दिला. हे आपल्या लक्षात असले पाहिजे असं त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे लोक इथे अधिकाऱ्यांपुढे ताठपणे बसून आदेश देत असतात. शिवसैनिकांची तशी परिस्थिती राहिली नाही. याची खंत मनात आहे. नशिबात असेल तर मंत्री होईन, नाही तर नाही. पण माझ्या शिवसैनिकांची मान खाली जाऊ देणार नाही. शिवाय माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असंही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले होते.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा