शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 06:52 IST

rajya sabha election 2022 : आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     

मुंबई : सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई लढायची. कुणालाही घाबरायचे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आज पुन्हा शक्तिप्रदर्शन- मंगळवारी सायंकाळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना वांद्रे-कुर्ला संकुलात अशाच पद्धतीने तीनही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यातून आपले संख्याबळ आघाडीने दाखवून दिले होते. - अशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन या बैठकीतून करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी घेतली जोरगेवारांची भेट- वेगवेगळी राजकीय विधाने करून चर्चेत असणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. - राज्यसभेसाठी घोडेबाजार होत आहे. हे दुर्दैवी आहे. आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहेत हा अन्याय आहे. दोघांना मतदानाची संधी मिळावी यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करीत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

शेवटच्या पाच मिनिटात मतदान : बच्चू कडूमुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलून धानखरेदी सुरू करावी, अन्यथा निवडणुकीत शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, असा गर्भित इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत मुख्यमंत्र्यांना दिला. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्याततीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोपभाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा