शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध कायम- राजू शेट्टी

By admin | Updated: May 30, 2015 02:03 IST

बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत भुमिअधिग्रहन कायद्यामध्ये दोन सुधारणा करण्याची मागणी.

बुलडाणा: भुमि अधिग्रहन कायदा हा जुना आहे. तसा हा कायदा शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेला आहे. संसदेत आम्ही व काही घटक पक्षाने या कायद्याला विरोध दर्शविल्यामुळेच या कायद्यामध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत ९ सुधारणा केल्या आहेत; मात्र अद्याप दोन सुधारणा या कायद्यामध्ये अजूनही बाकी असून जो पर्यंत ह्या सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत या कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध राहील अशी भुमिका खा. राजू शेट्टी यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे बुलडाणा जिल्ह्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या सोबत यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, सतिष बुरुळकर, योगेश पांडे, गजानन अमदाबादकर उपस्थित होते. खा. राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही सत्तेत असतानाही शेतकर्‍यांच्या हीतासाठी भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध केला. त्यातून सरकारला या कायद्यामध्ये ९ सुधारणा कराव्या लागल्या. अद्याप दोन सुधारणा बाकी आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या परवाणगी शिवाय जमिन अधिग्रहीत करू नये आणि ५ वर्षात प्रकल्प उभा न राहल्यास जमिन शेतकर्‍यांना परत करावी. अशा ह्या दोन सुधारणा आहेत. ह्या सुधारणा जो पर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंंत या कायद्याला आमचा विरोध असेल. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्यावे हे सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही याची खंत व्यक्त करताना शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक होणे आवश्यक होती, दुर्दैवाने तेही होतांना दिसत नसल्याचे खा. शेट्टी यांनी सांगीतले. यावर तुमच्या मागण्या सरकार मान्य करत नसेल तर सरकारमधून बाहेर पडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरात मात्र आम्ही संघर्ष करू येवढेच उत्तर खा. राजू शेट्टी यांनी दिले.

*सरकारच्या मागे कटोरा घेवून फिरणार नाही!

     केंद्रात सत्ता आल्यास सत्तेत वाटा द्यावा अशी आमची मागणी होती. विस्तारीत मंत्रीमंळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रीपद देण्याचे कबुल सुध्दा केले आहे. मात्र दिलेला शब्द पाळणे सरकार कर्तव्य आहे. आम्ही मंत्रीपदासाठी त्यांच्या मागे कटोरा घेूवन फीरणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत असा टोला. खा. राजू शेट्टी यांनी मारला.

*हे तर शेतकरी चळवळीचे अपयश

      विदर्भातील शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आत्महत्या थांबता थांबेनात, शेतकरी आत्महत्येला कारणे अनेक असतील पण ,यावर कायमस्वरूपी उपाय अद्याप आम्ही शोधू शकलो नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत हे शेतकरी चळवळीचे अपयश आहे. या बद्दल आम्हालाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे अशी कबुली देत खा. राजू शेट्टी म्हणाले की, आता यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद विदर्भाला आम्ही मुद्दाम दिले. या माध्यमातून या भागात शेतकरी चळवळ उभी करून शेतकर्‍यांना शेतीला उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी येणार्‍या काळात रविकांत तुपकर काम करतील असे त्यांनी सांगीतले.