शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राजू शेट्टी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवणारे नेते नाहीत : सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 22, 2017 18:43 IST

केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका चुकीची आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
 
दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना खोत म्हणाले की, मंत्रीपदाची नव्हे तर कोणत्याच पदाची अपेक्षा राजू शेट्टी यांनी कधीच ठेवली नाही. शेतकºयांसाठीच त्यांनी आजपर्यंत चळवळ केली आहे. अनेक वर्षांपासूनचे आम्ही दोघे सोबती आहोत. त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका योग्य नाही. माझ्याबद्दल कोण, कशी टीका करीत आहे, याच्याकडे मी लक्ष देत नाही. माझा चष्मा चांगला असल्यामुळे मला जग चांगलेच दिसते. दुसºयांचे चष्मे कसे आहेत, हे मला माहीत नाही.
 
ते म्हणाले की, कर्जमाफीच्या विषयावरून काहींनी ढोल-ताशे वाजविण्याचे काम केले आहे. मीही आंदोलने करीतच आलो आहे. मला या गोष्टी माहीत आहेत. चर्चेला जाण्याअगोदर ढोल-ताशे वाजवायचे असतात, तेव्हा कळते की पाहुणे येत आहेत. त्यामुळे काहींनी ढोल-ताशे वाजविले. तसे काही पाहुणे आलेही होते. आम्ही अशा पाहुण्यांनासुद्धा चर्चेला बोलावले. आता निर्णय झाल्यानंतरही कागद जाळून काहीजण पुन्हा त्याच गोष्टी करीत आहेत. या गोष्टी चालायच्याच.
 
ते म्हणाले की, आमच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचे दार उघडावे, यासाठी आम्ही आजपर्यंत आंदोलने केली. आता परिस्थिती तशी नाही. मी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे समजूतदार मुख्यमंत्री भेटले. त्यांनी चर्चेचे दार उघडे केले. त्यामुळे आक्रमक होण्याची गरजच काय? पंढरपूर ते बारामती, तर कधी कराडपर्यंत आम्ही चालत जाऊन शेतकºयांसाठी आंदोलने केली, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे दरवाजे कधीच उघडले नाहीत. देशातील व राज्यातील आजवरच्या शेतकरी आंदोलनात शेतकºयांचे बळी गेले. यावेळी प्रथमच हिंसा न होता, रक्त न सांडता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले आहेत.
 
एन. डी. पाटील आदरस्थानीच-
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील माझ्याबद्दल काहीही बोलले तरी त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ते सामाजिक चळवळीतील भीष्माचार्य आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, असे खोत म्हणाले. सदाभाऊ खोत सरकारधार्जिणे झाल्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे, अशी टीका प्रा. डॉ. पाटील यांनी बुधवारी केली होती.