शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवणारे नेते नाहीत : सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 22, 2017 18:43 IST

केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका चुकीची आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
 
दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना खोत म्हणाले की, मंत्रीपदाची नव्हे तर कोणत्याच पदाची अपेक्षा राजू शेट्टी यांनी कधीच ठेवली नाही. शेतकºयांसाठीच त्यांनी आजपर्यंत चळवळ केली आहे. अनेक वर्षांपासूनचे आम्ही दोघे सोबती आहोत. त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका योग्य नाही. माझ्याबद्दल कोण, कशी टीका करीत आहे, याच्याकडे मी लक्ष देत नाही. माझा चष्मा चांगला असल्यामुळे मला जग चांगलेच दिसते. दुसºयांचे चष्मे कसे आहेत, हे मला माहीत नाही.
 
ते म्हणाले की, कर्जमाफीच्या विषयावरून काहींनी ढोल-ताशे वाजविण्याचे काम केले आहे. मीही आंदोलने करीतच आलो आहे. मला या गोष्टी माहीत आहेत. चर्चेला जाण्याअगोदर ढोल-ताशे वाजवायचे असतात, तेव्हा कळते की पाहुणे येत आहेत. त्यामुळे काहींनी ढोल-ताशे वाजविले. तसे काही पाहुणे आलेही होते. आम्ही अशा पाहुण्यांनासुद्धा चर्चेला बोलावले. आता निर्णय झाल्यानंतरही कागद जाळून काहीजण पुन्हा त्याच गोष्टी करीत आहेत. या गोष्टी चालायच्याच.
 
ते म्हणाले की, आमच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचे दार उघडावे, यासाठी आम्ही आजपर्यंत आंदोलने केली. आता परिस्थिती तशी नाही. मी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे समजूतदार मुख्यमंत्री भेटले. त्यांनी चर्चेचे दार उघडे केले. त्यामुळे आक्रमक होण्याची गरजच काय? पंढरपूर ते बारामती, तर कधी कराडपर्यंत आम्ही चालत जाऊन शेतकºयांसाठी आंदोलने केली, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे दरवाजे कधीच उघडले नाहीत. देशातील व राज्यातील आजवरच्या शेतकरी आंदोलनात शेतकºयांचे बळी गेले. यावेळी प्रथमच हिंसा न होता, रक्त न सांडता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले आहेत.
 
एन. डी. पाटील आदरस्थानीच-
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील माझ्याबद्दल काहीही बोलले तरी त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ते सामाजिक चळवळीतील भीष्माचार्य आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, असे खोत म्हणाले. सदाभाऊ खोत सरकारधार्जिणे झाल्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे, अशी टीका प्रा. डॉ. पाटील यांनी बुधवारी केली होती.