शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

१६ जुलैनंतर मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 06:11 IST

राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय

पुणे/ कोल्हापूर : राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल व त्यातून जी परिस्थिती उदभवेल त्यास सरकार जबाबदार असेल असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चात शेतकºयांनी आसूड ओढून वेगळेच वातावरण तयार केले. शेतकरी आसूड ओढताना पुणेकर जनता उत्सुकतेने पाहत होती.शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापुढे शेतकºयांची लूट होऊ देणार नाही. १५०० कोटी रुपयांची उसाची थकीत एफआरपी येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकºयांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत आहे. ३० जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल.मुख्यमंत्र्यांवरही टीकेची झोडविदर्भात पिककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयाने शेतकºयाच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु त्यास लगेच जामीन मंजूर झाला याबद्दल संतप्त शब्दात समाचार घेवून शेट्टी म्हणाले,‘ असा प्रकार पुन्हा घडलाच तर जाग्यावर त्या अधिकाºयाचे डोळे फोडा, तरच शेतकºयाच्या पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांना या घटनेचे कांहीच कसे वाटले नाहीत. ते झोपले आहेत का अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी