शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शिवसेनेला गाफील ठेऊन राज यांचा 'मोके पे चौका'

By admin | Updated: August 18, 2016 14:51 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात अचूक टायमिंग साधण्यासाठी ओळखले जातात. प्रतिस्पर्धी गाफील असताना मिळालेल्या संधीचा राजकीय फायदा उचलण्यात राज ठाकरे तरबेज आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १८ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात अचूक टायमिंग साधण्यासाठी ओळखले जातात. प्रतिस्पर्धी गाफील असताना मिळालेल्या संधीचा राजकीय फायदा उचलण्यात राज ठाकरे तरबेज आहेत. दहीहंडीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करतानाही राज यांनी हेच टायमिंग साधले आहे. 
 
कारण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असला तरी, दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे लाखो गोविंदा या निर्णयावर नाराज होते. राज यांनी जाहीरपणे २० फूट उंचीवरुन गोविंदा पथकांची बाजू उचलून धरताना, हिंदू सणांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. म्हणजेच एकाच दगडात राज यांनी दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. 
 
आणखी वाचा 
 
२००८-०९ मध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक मराठी माणसाचे मुद्दे उचलून धरले होते. मराठी पाटया, रेल्वेतील नोकरभरती, म्हाडामध्ये मराठी माणासाला घर इत्यादी मराठी माणसांचे मुद्दे उचलून धरताना त्यांनी शिवसेनेची पुरती गोची केली होती. त्यावेळी गाफील असलेली शिवसेना राज यांच्या लागोपाठच्या हल्ल्यांमुळे निष्प्रभ झाली होती. शिवसेनेपेक्षा आपला पक्ष मराठी माणसाचे नेतृत्व करण्यास अधिक सक्षम असल्याचा मुद्दा मराठी मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले होते. 
 
त्याचा २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठा फायदाही झाली होता. २०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेला गळती लागल्यामुळे राज शांत दिसत होते. 
 
आता दहीहंडीच्या मुद्यावरुन त्यांनी गोविंदा उत्सवात सहभागी होणारे लाखो तरुण आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरुन गमावलेला मतदार आणि विश्वास पुन्हा मिळवण्याची खेळी खेळली आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कदाचित या व्यूहरचनेचा फायदा राज ठाकरे यांच्या मनसेला होऊ शकतो.