शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवा विभागात राजाराम भापकर गुरुजी ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By admin | Updated: April 11, 2017 22:13 IST

‘महाराष्ट्राचा मांझी’ अशी ओळख असलेले अहमदनगरचे राजाराम भापकर गुरुजी यांना यंदाचा लोकसेवा-समाजसेवा विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - ‘महाराष्ट्राचा मांझी’ अशी ओळख असलेले अहमदनगरचे राजाराम भापकर गुरुजी यांना यंदाचा लोकसेवा-समाजसेवा विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 
लोकसेवा-समाजसेवा विभागात युसूफ मेहरअली सेंटर, व्हाईट आर्मी, सुनील देशपांडे, डॉ. निखिल दातार यांना नामांकने जाहीर झाली होती. मात्र राजाराम भापकर गुरुजींनी बाजी मारली. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
(आयुष्यातलं पहिलं ट्विट सुषमा स्वराजांमुळे यशस्वी झालं - डॉ लकडावाला)
(डॉ. लकडावालांनी अशारितीने इमानला उपचारांसाठी आणले भारतात)
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
 
राजाराम भापकर गुरुजी यांची माहिती
राजाराम भापकर हे अहमदनगरमध्ये भापकर गुरुजी नावानेच ओळखले जातात, पण त्यांची खरी ओळख आहे ‘महाराष्ट्राचा मांझी’ म्हणून. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना, आपल्या गावातील रस्त्याची अडचण त्यांनी ओळखली. राज्य सरकारकडे मागणी करूनही रस्ता मंजूर झाला नाही. त्यामुळे नगर तालुक्यात गुंडेगाव परिसरात त्यांनी स्वखर्चाने डोंगरमाथ्यावर २६ किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्यांनी गेल्या ५७ वर्षांत सुमारे ४0 किलोमीटरचे रस्ते स्वत:च्या खर्चाने बांधले आहेत. त्यासाठी तब्बल ७ डोंगरांतून खणून वाट तयार करावी लागली. कोळेगावच्या शाळेत ते शिकवत, तेव्हा विद्यार्थ्यांना डोंगर पार करून शाळेत यावे लागे. त्यामुळे विद्यार्थीही शाळेत यायला टाळाटाळ करीत. कोळेगाव ते देऊळगाव हे अंतर तेव्हा २९ किलोमीटर होते, पण भापकर गुरुजींनी रस्ते बांधल्यामुळे ते आता १0 किलोमीटर झाले आहे. स्वत:च्या नोकरीतील पेन्शन विक्री, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी अशी यातील निम्मी रक्कम त्यांनी केवळ या रस्त्याच्या बांधणीसाठी खर्च केली. सरकारकडून एकही पै घेतली नाही. त्यांनी तयार केलेल्या या रस्त्यावर गत १ डिसेंबरला ‘गुंडेगाव-पुणे’ ही पहिली एस.टी. बस धावली. भापकर हे आज ८५ वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही ते सामाजिक कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. पायजमा, सदरा आणि गांधी टोपी अशा वेशातील भापकर गुरुजी आजही सक्रिय आहेत. बिहारमधील दशरथ मांझी या मजुराने २२ वर्षांत ११0 किलोमीटरचे रस्ते स्वखर्चाने बांधले. त्यामुळे त्याच्या गावापासून गया हे अंतर ५५ किलोमीटरवरून १५ किलोमीटरवर आले. भापकर गुरुजींनी काम सुरू केले, तेव्हा त्यांना कदाचित दशरथ मांझी हे नाव माहीतही नसेल, पण तेही आता महाराष्ट्राचे मांझी ठरले आहेत. संपूर्ण भारतात भापकर गुरुजींच्या कामाची दखल घेतली गेली, परदेशी नियतकालिकांनीही त्यांच्या कामाचा गौरव केला, पण महाराष्ट्राला मात्र, आजतागायत त्यांच्या कार्याची ओळख झालेली नाही. समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षक असतो, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी कहाणी भापकर गुरुजींनी आपल्या घामाच्या शाईने लिहून ठेवली आहे.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com