शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

राजनचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: November 6, 2015 01:57 IST

गँगस्टर छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हा

- जमीर काझी,  मुंबईगँगस्टर छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शिवाय संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक करारानुसार (यूएनसीटीओसी) त्याच्याविरुद्धचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले आहे.छोटा राजनचा तपास सीबीआय करणार असल्याने त्याला मुंबईत आणले जाईल की नाही? त्याच्यावरील खटले मुंबईत चालतील की दिल्लीत? याबाबत राज्य सरकार काहीच सांगू शकत नाही, याबाबतचा निर्णय सर्वस्वी सीबीआयकडून घेतला जाईल. सीबीआयला तपासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक असेल, असेही बक्षी यांनी स्पष्ट केले. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे छोटा राजनला मुंबईत आणण्याची शक्यता सध्यातरी संपुष्टात आलेली आहे. दहा दिवसांपूर्वी पकडल्या गेलेल्या राजनला इंडोनेशिया सरकारने हकालपट्टीवर (डिर्पोटेशन) गुरुवारी भारााच्या हवाली केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गृहसचिव बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांची विशेष बैठक घेतली. बैठकीत राजनवर महाराष्ट्रासह अन्य राज्य व परदेशातही अनेक गुन्हे दाखल असल्याने तो ‘यूएनसीटीओसी’अंतर्गत गुन्हेगार आहे. भारतात यासंदर्भात सीबीआय ही समन्वय तपास यंत्रणा (नोडल एजन्सी) असल्याने महाराष्ट्रातील सर्व गुन्हे व त्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बक्षी व अहमद जावेद यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात संयुक्त पत्रकार परिषद घेवून त्याबाबतची माहिती दिली. छोटा राजनने मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी दाऊद गँगशी मिळालेले असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला का? असे विचारले असता त्याचा इन्कार करत बक्षी म्हणाले, सरकारने संघटित गुन्हेगारीचा बिमोड करणे व कायदा व सुव्यवस्था अस्तित्त्वात आणण्याला प्राधान्य दिले आहे. त्याअनुंषगाने छोटा राजनला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्याने पकडण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यासाठी राष्ट्रांनी परस्पराशी सहकार्य करण्याबाबतच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘यूएनसीटीओसी’ करारामध्ये भारताचाही सहभाग आहे.