शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:54 IST

नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही.

रत्नागिरी/राजापूर : नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही. तुम्ही एकत्र राहणार असाल तर मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रकल्पग्रस्तांना दिले.राजापूर तालुक्यातील नाणारसह १५ गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. नाणार परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना, भूमिका जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी तेथील प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मनसेची भूमिका प्रकल्पग्रस्तांसमोर मांडली.ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे गोवा, केरळमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प नेण्याचे धाडस शासन करीत नाही, त्याप्रमाणेच कोकणातून रिफायनरी प्रकल्प हद्दपार केल्यावर असे प्रदूषणकारी प्रकल्प पुन्हा येथे आणण्याचे धाडस सरकार पुन्हा कधीच करणार नाही.आतापर्यंत अनेक लोक, नेते येथे येऊन गेले. त्यांनी आश्वासने दिली. पण इतर लोक आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे.एखादी गोष्ट मी हातामध्ये घेतल्यानंतर ती शेवटपर्यंत नेल्याशिवाय मी थांबत नाही. आता मुंबईत गेलो की मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रकल्प रद्द करा, हे त्यांच्या कानी घालेन.‘विकले जाणाºयांना बुकला’ : प्रकल्प जर रद्द करायचा असेल तर सर्वांना एकजूट राखावी लागेल. हे मान्य आहे का, असे ठाकरे यांनी विचारले असता ‘होय’ असा जोरदार प्रतिसाद उपस्थितांनी दिला. आजपर्यंत जे प्रकल्प आले त्यांना प्रथम तीव्र विरोध झाला. नंतर पैशांची पॅकेज दिली गेली. लोक घरंगळत गेले. यापुढे जर असे प्रकल्प नको असतील तर एकजूट राखा. विकल्या जाणाºया लोकांवर लक्ष ठेवा. त्यांना बुकलले पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेतृत्व करणारे विकले गेले तर तुम्हाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे