शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश

By admin | Updated: April 27, 2016 06:17 IST

मुंबईकरांना शांतपणे सर्व सहन करण्याची सवय लागली आहे.

मुंबई : मुंबईकरांना शांतपणे सर्व सहन करण्याची सवय लागली आहे. वाहतूककोंडी, खड्डे याकडे मुंबईकर दुर्लक्ष करतात, असा टोला लगावत उच्च न्यायालयाने पावसाळ्यापूर्वी मुंबईचे रस्ते दुरुस्त आणि खड्डेमुक्त करण्याची सूचनाही पालिकेला केली. तसेच रस्ते दुरुस्तीचा आणि खड्डे बुजवल्याचा प्रगती अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवरील सुनावणीदरम्यान मध्यस्थींनी पालिकेने नागरिकांसाठी खड्ड्यांसंदर्भात तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेले संकेतस्थळ बंद असल्याची तक्रार उच्च न्यायालयाकडे केली. ‘संकेतस्थळाबरोबरच महापालिकेने नागरिकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबरही उपलब्ध केला होता. मात्र हा टोल फ्री नंबरही बंद आहे,’ अशी माहिती या याचिकेतील मध्यस्थीच्या वकिलांनी दिली. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी टोल फ्री नंबर सुरू आहे तर संकेतस्थळाऐवजी ३० मार्चपासून फेसबुक अकाउंटवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली ‘वेगवगेळ्या यंत्रणा रस्ते खोदतात, मात्र ते पूर्वीच्या स्थितीत ठेवत नाहीत. जगात तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे की, एका रात्रीत खड्डे बुजवता येऊ शकतात. मात्र ते येथे वापरले जात नाही,’ असे म्हणत खंडपीठाने खड्डे आणि रस्ता दुरुस्तीचे काम कधी पूर्ण करण्यात येणार, अशी विचारणा महापालिकेकडे केली. त्यावर अ‍ॅड. साखरे यांनी मोठ्या रस्त्यांचे काम ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन खंडपीठाला दिले. (प्रतिनिधी)>पत्राचे याचिकेत रूपांतरमुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अनेक जीव जात आहेत, अशा आशयाचे पत्र उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीशांना लिहिले. त्यांच्या पत्राची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांच्या पत्राचे रूपांतर जनहित याचिकेत करून ही याचिका स्वत:च दाखल करून घेतली.