शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

आदिवासी भागात साडेचार हजार हेक्टरवर रेनवॉटर हार्वेस्टिंग

By admin | Updated: June 2, 2014 02:03 IST

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागात रेनवॉटर हार्वेस्टिंग; उताराला आडवी पेरणीचा प्रयोग सफल!

अकोला : उताराला आडवी पेरणी केल्यामुळे उत्पन्नात भर तर पडतेच शिवाय पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरू न पुनर्भरणास मदत होत आहे. तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी साडेचार हजार हेक्टरवर एका वर्षात ३६०० कोटी लीटर पडलेल्या पावसाचे पाणी अडवून जिरविण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी या पद्धतीने उताराला आडवी पेरणी केल्यास शेती उत्पादन वाढीसह जमिनीत जलपुनर्भरणास मदत होणार आहे. तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावातील शेतकर्‍यांच्या उतारपाटी असलेल्या शेतीतील रंग भुरकट व मुरमाड झाला आहे. भविष्यातील धोका ओळखून संवर्ग विकास समितीने या भागात सेंद्रिय शेतीशाळा सुरू केल्या आहेत. आदिवासी गावातील शेतकर्‍यांना उताराला आडवी पेरणीसाठी प्रवृत्त केले. आता या प्रयत्नाला यश येऊ लागले असून, मागील वर्षी १८ गावांमधून साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी केली. त्याचा फायदा तेव्हाच दिसून आल्यामुळे, यावर्षीसुद्धा आदिवासी भागात उताराला आडवी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

*बिनखर्चाचे तंत्रज्ञान

आदिवासी गावातील शेतकर्‍यांनी विनाखर्च या तंत्रज्ञानातून साडेचार हजार हेक्टर्स क्षेत्रावर एका वर्षात ३६०० कोटीलीटर पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत जिरवले आहे. सिंचन विभागाच्या अंदाजानुसार ६.१३ दशलक्ष घन मीटर पाणी साठविण्यासाठी साधारणत: ३८ कोटी रुपये खर्चून धरण बांधावे लागले असते. या प्रयोगातून शेतातील माती वाहून जाण्याचे थांबले.