शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: October 4, 2016 04:17 IST

एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद/पुणे: एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह इतर ओढे-नद्यांना पूर आला आहे़ या पावसामुळे लाखो एकरावरील खरिप पिकांचे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे़ आजवर जिल्ह्यात १०६़४७ मिमी पावसाची नोंद झाली. येथील १३३ प्रकल्प तुडुंब भरले असून, ५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर, जळकोट, उदगीर आणि चाकूर तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, एनडीआरएफच्या पथकाचे मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. पुरात अडकलेल्या ७२ जणांचे प्राण वाचविण्यात या पथकाला यश आले असून, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जळकोट तालुक्यातील नऊपैकी सहा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मांजरा, तावरजा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२२.३५ टक्के पाऊस झाला. शनिवार व रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) या गावात मांजरा नदीचे पाणी घुसल्याने २०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी गावातील पाणी ओसरल्याचे नागरिकांनी सांगितले. परळी तालुक्यातील संगम या गावचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमवारी येथील जनजीवन सुरळीत झाले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे. जळगाव-नंदुरबारमध्येही मुसळधारजळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तोंडापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून तितूर, गडद नदीला पूर आला आहे. चाळीसगावमधील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.शारदीय नवरात्रौत्सवातील सोमवारी तिसऱ्या माळेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे़