शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: October 4, 2016 04:17 IST

एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद/पुणे: एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह इतर ओढे-नद्यांना पूर आला आहे़ या पावसामुळे लाखो एकरावरील खरिप पिकांचे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे़ आजवर जिल्ह्यात १०६़४७ मिमी पावसाची नोंद झाली. येथील १३३ प्रकल्प तुडुंब भरले असून, ५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर, जळकोट, उदगीर आणि चाकूर तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, एनडीआरएफच्या पथकाचे मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. पुरात अडकलेल्या ७२ जणांचे प्राण वाचविण्यात या पथकाला यश आले असून, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जळकोट तालुक्यातील नऊपैकी सहा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मांजरा, तावरजा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२२.३५ टक्के पाऊस झाला. शनिवार व रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) या गावात मांजरा नदीचे पाणी घुसल्याने २०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी गावातील पाणी ओसरल्याचे नागरिकांनी सांगितले. परळी तालुक्यातील संगम या गावचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमवारी येथील जनजीवन सुरळीत झाले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे. जळगाव-नंदुरबारमध्येही मुसळधारजळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तोंडापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून तितूर, गडद नदीला पूर आला आहे. चाळीसगावमधील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.शारदीय नवरात्रौत्सवातील सोमवारी तिसऱ्या माळेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे़