शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: October 4, 2016 04:17 IST

एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद/पुणे: एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह इतर ओढे-नद्यांना पूर आला आहे़ या पावसामुळे लाखो एकरावरील खरिप पिकांचे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे़ आजवर जिल्ह्यात १०६़४७ मिमी पावसाची नोंद झाली. येथील १३३ प्रकल्प तुडुंब भरले असून, ५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर, जळकोट, उदगीर आणि चाकूर तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, एनडीआरएफच्या पथकाचे मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. पुरात अडकलेल्या ७२ जणांचे प्राण वाचविण्यात या पथकाला यश आले असून, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जळकोट तालुक्यातील नऊपैकी सहा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मांजरा, तावरजा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२२.३५ टक्के पाऊस झाला. शनिवार व रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) या गावात मांजरा नदीचे पाणी घुसल्याने २०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी गावातील पाणी ओसरल्याचे नागरिकांनी सांगितले. परळी तालुक्यातील संगम या गावचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमवारी येथील जनजीवन सुरळीत झाले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे. जळगाव-नंदुरबारमध्येही मुसळधारजळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तोंडापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून तितूर, गडद नदीला पूर आला आहे. चाळीसगावमधील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.शारदीय नवरात्रौत्सवातील सोमवारी तिसऱ्या माळेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे़