शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

Maharashtra Election 2019: सेनेच्या वचननाम्यात आश्वासनांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 04:49 IST

दिलेले वचन पूर्ण करू । उद्धव ठाकरे; शेतकरी, युवा वर्गांवर लक्ष केंद्रित #MaharashtraElection2019

मुंबई : महाराष्ट्राचा कोणताही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही. पूर्ण करता येतील अशीच वचने शिवसेना देते आणि दिलेले वचन पूर्ण करतेच, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. एक रूपयात आरोग्य चाचण्या, दहा रूपयांत सकस आहाराची थाळी, वीज दरकपात, दुर्बल घटकातील मुलींचे विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण अशी विविध आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली.

मातोश्री निवासस्थानी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशाला मंदीचा विळखा पडतोय, लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही आहेच. त्यामुळे सरकारी तिजोरीचा विचार करूनच शिवसेनेने वचननामा तयार करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दहा रूपयांत थाळीची योजना आहे. त्यासाठी राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार आहोत. त्यात महिला बचत गटांना सामावून घेण्यात येईल. अल्पभूधारक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी १० हजार रुपये जमा करण्यात येईल, ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तर, आर्थिक दुर्बल घटकांंतील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करण्याची घोषणाही वचननाम्यात करण्यात आली आहे.

यावेळी ठाकरे यांच्यासह खा. अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर शहर सडक योजना राबविण्यात येईल. जीएसटीमुळे स्थानिक स्वराज संस्थांकडे निधीची वानवा आहे. त्यामुळे गावांना शहरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणांसाठी जोडणारी ५० हजार किलोमीटरचे रस्ते बांध्ू. हे रस्ते टिकाऊ असतील. राज्याच्या अर्थसंकल्पातून त्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे आदित्य यांनी सांगितले.

या वचननाम्यात शिवसेनेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवा आदी घटकांसह ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.1अल्पभूधारक व दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी थेट दहा हजार रूपये2आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण3राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी4तालुकास्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५००बसची विशेष सोय5३०० युनिटपर्यंतघरगुती वीजदरात तीसटक्के कपात6राज्यातील सर्व खेड्यातील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण7सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल8निराधार पेन्शन योजनेतील मानधन दुप्पट करणार9राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे10 गावागावातील धार्मिक स्थळांना अनुदान

टॅग्स :Shiv Senaशिवसेना