शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: सेनेच्या वचननाम्यात आश्वासनांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 04:49 IST

दिलेले वचन पूर्ण करू । उद्धव ठाकरे; शेतकरी, युवा वर्गांवर लक्ष केंद्रित #MaharashtraElection2019

मुंबई : महाराष्ट्राचा कोणताही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही. पूर्ण करता येतील अशीच वचने शिवसेना देते आणि दिलेले वचन पूर्ण करतेच, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. एक रूपयात आरोग्य चाचण्या, दहा रूपयांत सकस आहाराची थाळी, वीज दरकपात, दुर्बल घटकातील मुलींचे विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण अशी विविध आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली.

मातोश्री निवासस्थानी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशाला मंदीचा विळखा पडतोय, लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही आहेच. त्यामुळे सरकारी तिजोरीचा विचार करूनच शिवसेनेने वचननामा तयार करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दहा रूपयांत थाळीची योजना आहे. त्यासाठी राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार आहोत. त्यात महिला बचत गटांना सामावून घेण्यात येईल. अल्पभूधारक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी १० हजार रुपये जमा करण्यात येईल, ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तर, आर्थिक दुर्बल घटकांंतील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करण्याची घोषणाही वचननाम्यात करण्यात आली आहे.

यावेळी ठाकरे यांच्यासह खा. अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर शहर सडक योजना राबविण्यात येईल. जीएसटीमुळे स्थानिक स्वराज संस्थांकडे निधीची वानवा आहे. त्यामुळे गावांना शहरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणांसाठी जोडणारी ५० हजार किलोमीटरचे रस्ते बांध्ू. हे रस्ते टिकाऊ असतील. राज्याच्या अर्थसंकल्पातून त्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे आदित्य यांनी सांगितले.

या वचननाम्यात शिवसेनेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवा आदी घटकांसह ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.1अल्पभूधारक व दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी थेट दहा हजार रूपये2आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण3राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी4तालुकास्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५००बसची विशेष सोय5३०० युनिटपर्यंतघरगुती वीजदरात तीसटक्के कपात6राज्यातील सर्व खेड्यातील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण7सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल8निराधार पेन्शन योजनेतील मानधन दुप्पट करणार9राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे10 गावागावातील धार्मिक स्थळांना अनुदान

टॅग्स :Shiv Senaशिवसेना