शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

कोकणात पावसाच्या धारा गोठलेल्याच...

By admin | Updated: August 23, 2015 00:29 IST

राज्यात कोठेही पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणातल्या त्याच्या धारा मात्र कायम असतात, हे दरवर्षीचे चित्र यंदा बदलून गेले आहे. यंदा कोकणातही पावसाच्या धारा गोठल्या

रत्नागिरी : राज्यात कोठेही पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणातल्या त्याच्या धारा मात्र कायम असतात, हे दरवर्षीचे चित्र यंदा बदलून गेले आहे. यंदा कोकणातही पावसाच्या धारा गोठल्या असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी पाऊस यंदाच पडला आहे.कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचा हंगाम समजला जातो. या कालावधीत सरासरी ३५00 मिलिमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित धरले जाते. मृगाची सुरुवात जोरदार बरसण्याने होते. १ जून ते १५ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे या नक्षत्रात शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. गेल्या वर्षी रोहिणीच्या प्रारंभी पाऊस मुसळधार झाला परंतु, जून, जुलै, आॅगस्टही कोरडाच गेला. पावसाची सर्वच नक्षत्रे पावसाविना गेली. त्यानंतर आॅगस्टच्या अखेरीस पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली ती अगदी १५ सप्टेंबरपर्यंत. या महिन्यात झालेल्या पावसाने मग वर्षाचा कोटा पूर्ण केला होता. मात्र, या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे आगमन संथगतीने झाले आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेने हे प्रमाण खूपच कमी आहे.सन २0११ ते २0१५ या पाच वर्षांतील १ जून ते २१ आॅगस्ट या कालावधीतील सर्वाधिक पाऊस २0१३मध्ये (सरासरी ३६४0 मिलिमीटर) झाला आहे. मात्र, यंदा त्याच्यापेक्षा निम्म्याच, केवळ १७४५ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गतवर्षी याच कालावधीत २२00 मिलिमीटर पाऊस झाला होता. हा पाऊस गेल्या १० वर्षांतील नीचांकी पाऊस होता. मात्र, या वर्षी गतवर्षापेक्षाही ४६५ मिलिमीटरने पाऊस अजूनही कमीच आहे. कोकणात जून ते सप्टेंबर पाऊससरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित.गेल्या वर्षी रोहिणीच्या प्रारंभी पाऊस मुसळधार.या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे आगमन संथगतीने.गत पाच वर्षांच्या तुलनेने हे प्रमाण खूपच कमी.पावसाची सुरुवात वेळेत, मात्र प्रमाण कमीच. पाच वर्षातील १ जून ते २१ आॅगस्ट या कालावधीतील एकूण पाऊस (सरासरी मिलिमीटर)