शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

दिवाळी संपेपर्यंत मुंबईत बरसणार पाऊस; हवामान शास्त्र विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 05:35 IST

मान्सूनने अखेर बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरयाणा राज्याच्या काही भागातून मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.

मुंबई : मान्सूनने अखेर बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरयाणा राज्याच्या काही भागातून मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. सर्वसाधारणपणे १ सप्टेंबर रोजी मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि १ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातून माघारी फिरतो. मात्र या वेळी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला तब्बल एक महिना विलंब झाला आहे. सर्वसाधारण अंदाजाप्रमाणे ९ नोव्हेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून माघार घेईल. म्हणजेच तब्बल आणखी एक महिना पावसाचा तडाखा बसणार आहे.मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला बुधवारी म्हणजे ९ आॅक्टोबर रोजी सुरुवात झाली. राजस्थानसह पंजाब आणि हरयाणाच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. या परतीच्या प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे. जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सूनने देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला चांगलेच झोडपून काढले. देशभरात चार महिन्यांत तब्बल ११० टक्के पावसाची नोंद झाली असून, महाराष्ट्रात ३२ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही देशासह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा मारा कायम होता. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात याच काळात पाऊस चांगला झाला. आता त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी तो महाराष्ट्रातून माघार घेण्यास महिना जाईल.हवामान अनुकूलमान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असून, येत्या काळात मान्सून उत्तर भारतातून म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनही माघार घेईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमधूनही तो आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात माघार घेण्याची शक्यता आहे. याच काळात पूर्व भारतातूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.दुहेरी वातावरणाने मुंबईकर त्रस्त; कमाल तापमान ३५ अंशमान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असून, येत्या काळात मान्सून उत्तर भारतातून म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनही माघार घेईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमधूनही तो आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात माघार घेण्याची शक्यता आहे. याच काळात पूर्व भारतातूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशमान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी राजस्थानातून सुरू झाला असतानाच दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरासह राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस पडला. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी मात्र येथे कडाक्याचे ऊन पडले होते. मुंबई व उपनगरातील ठिकठिकाणचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. १० आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.मुंबईत दोन दिवस आकाश राहणार ढगाळ११ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १२ आॅक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता येथे गुरुवारसह शुक्रवारी शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.

टॅग्स :Rainपाऊस