शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या होऊ लागल्या नामशेष?

By admin | Updated: July 1, 2016 03:54 IST

पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत.

शशिकांत ठाकूर,

कासा - पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत. रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने तसेच ग्रामिण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने रानभाज्यांचा वापर आहारात सर्रास होत असे. मात्र, जंगलात लावले जाणारे वणवे, अमाप जंगलतोड व आधुनिक गृहीणींना या रानभाज्यांची पाककला माहीत नसल्याने सध्या त्यांचा होणारा कमी वापर यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पावसाळयात कंद भाज्यामध्ये कोन, करांदे, आळू, कणक, सुरण, मोहदूळे (मोहाची फळे) आदिंचा वापर आहारात करतात. यामुळे कडु कंदापासून वळी बनवतात. त्यांचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी काही वेळ टाकून ठेवतात. तर फळभाज्यामध्ये सातपुते, करटोळी, कंटोळी, शिराळे, भोकर, अभई, गोमटी, वाघोटी, पेंढर, काकडं यांचा वापर होई. यामध्ये काकडांचा वापर लोत, धोधडी, शेवळी या पालेभाज्यांचा खाजरटपणा कमी करण्यासाठी करतात. तर पालेभाज्यामध्ये बाफळी, आळीम, शेवग्याचा पाला, शेवली, धोधडी, तेरा, आंबाडी, कोळी यात कोळी भाजीला विशेष महत्व आहे. आदिवासीत कोळीचा सण साजरा करतात.>खाजरटपणा घालविणारी काकडपावसाळा सुरू होताच काही दिवसातच रानावनात शेवळी ही रानभाजी मोठया प्रमाणात ठिकठिकाणी उगवते. त्याच्या भाजीला खाजरटपणा असल्याने त्यामध्ये काकड या वनस्पतीचे फळे वाटून टाकतात त्यामुळे भाजी चविष्ट बनते. कोळी वनस्पती दोन प्रकाराची असते. कडू व मोहरी यापैकी मोहरी कोळीचा वापर भाजीसाठी करतात. बाफळीची फळे ही औषधी उपयोगासाठी वापरतात. तसेच बांबूचे नवीन येणारे कोंब त्यांना लहान लहान काप देऊन त्याची भाजी बनवितात. त्यास शिंद असे म्हणतात. त्याचा वापर पावसाळयात मोठया प्रमाणात भाजीमध्ये केला जातो. परंतू सद्यस्थितीत मात्र या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.