शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या होऊ लागल्या नामशेष?

By admin | Updated: July 1, 2016 03:54 IST

पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत.

शशिकांत ठाकूर,

कासा - पावसाळा सुरू झाला की खेडयापाडयात पूर्वीच्या काळात रानावनात उगवणाऱ्या रानभाज्याचा वापर पावसाळा संपेपर्यंत मोठया प्रमाणात करताना दिसत. रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने तसेच ग्रामिण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने रानभाज्यांचा वापर आहारात सर्रास होत असे. मात्र, जंगलात लावले जाणारे वणवे, अमाप जंगलतोड व आधुनिक गृहीणींना या रानभाज्यांची पाककला माहीत नसल्याने सध्या त्यांचा होणारा कमी वापर यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पावसाळयात कंद भाज्यामध्ये कोन, करांदे, आळू, कणक, सुरण, मोहदूळे (मोहाची फळे) आदिंचा वापर आहारात करतात. यामुळे कडु कंदापासून वळी बनवतात. त्यांचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी काही वेळ टाकून ठेवतात. तर फळभाज्यामध्ये सातपुते, करटोळी, कंटोळी, शिराळे, भोकर, अभई, गोमटी, वाघोटी, पेंढर, काकडं यांचा वापर होई. यामध्ये काकडांचा वापर लोत, धोधडी, शेवळी या पालेभाज्यांचा खाजरटपणा कमी करण्यासाठी करतात. तर पालेभाज्यामध्ये बाफळी, आळीम, शेवग्याचा पाला, शेवली, धोधडी, तेरा, आंबाडी, कोळी यात कोळी भाजीला विशेष महत्व आहे. आदिवासीत कोळीचा सण साजरा करतात.>खाजरटपणा घालविणारी काकडपावसाळा सुरू होताच काही दिवसातच रानावनात शेवळी ही रानभाजी मोठया प्रमाणात ठिकठिकाणी उगवते. त्याच्या भाजीला खाजरटपणा असल्याने त्यामध्ये काकड या वनस्पतीचे फळे वाटून टाकतात त्यामुळे भाजी चविष्ट बनते. कोळी वनस्पती दोन प्रकाराची असते. कडू व मोहरी यापैकी मोहरी कोळीचा वापर भाजीसाठी करतात. बाफळीची फळे ही औषधी उपयोगासाठी वापरतात. तसेच बांबूचे नवीन येणारे कोंब त्यांना लहान लहान काप देऊन त्याची भाजी बनवितात. त्यास शिंद असे म्हणतात. त्याचा वापर पावसाळयात मोठया प्रमाणात भाजीमध्ये केला जातो. परंतू सद्यस्थितीत मात्र या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.